Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीElection Commission : महाराष्ट्रातील मतदार याद्या 'ऑल इज वेल'; काँग्रेसच्या आरोपांना निवडणूक...

Election Commission : महाराष्ट्रातील मतदार याद्या ‘ऑल इज वेल’; काँग्रेसच्या आरोपांना निवडणूक आयोगाचे उत्तर

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक संपून एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. परंतु, निवडणुकीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. राज्यात झालेल्या निवडणुकांबाबत काँग्रेस पक्षाने उपस्थित केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी उत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतदारांची नावे अनियंत्रितपणे जोडली किंवा काढली नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

काँग्रेसला दिलेल्या उत्तरात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, संध्याकाळी ५ वाजेच्या मतदानाच्या आकडेवारीची अंतिम मतदानाच्या आकडेवारीशी तुलना करणे योग्य ठरणार नाही. संध्याकाळी ५ ते ११:४५ या वेळेत मतदानात वाढ होणे सामान्य आहे, जे मतदारांच्या मतदानाच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे आणि पडलेली मते आणि मतांची मोजणी यात वास्तविक पण क्षुल्लक फरक कसा असू शकतो हे देखील नमूद केले आहे.

Bank Holiday : बँकांचे कामकाज तीन दिवस राहणार बंद

मतदानाचा तपशील देणारा वैधानिक फॉर्म १७-सी मतदान केंद्रावर मतदान संपल्यावर उमेदवारांच्या अधिकृत प्रतिनिधींकडे उपलब्ध असल्याने प्रत्यक्ष मतदारांच्या संख्येत बदल करणे अशक्य आहे यावर निवडणूक आयोगाने भर दिला.

आयोगाने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील मतदार यादी तयार करताना नियमावर आधारित प्रक्रिया पारदर्शकतेने पाळली गेली आणि राज्यातील मतदारांची नावे वगळण्यात कोणतीही अनियमितता झाली नाही. काँग्रेस प्रतिनिधींच्या सहभागासह मतदार यादी तयार करताना योग्य प्रक्रिया पाळण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने (Election Commission) स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -