मुख्यमंत्रीच ठरले चिटफंड घोटाळ्याचे बळी!

  47

मोहन चरण माझींनी केले जागरूक राहण्याचे आवाहन


भुवनेश्वर : जनतेने कष्टाने कमावलेला पैसा गुंतवताना सतर्क राहणे आवश्यक आहे. मी स्वतः चिटफंड घोटाळ्याचा बळी ठरलो होतो. त्यामुळे जनतेने पॉन्झी योजनांबद्दल सतर्क राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी (Mohan Charan Majhi) यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिन सोहळ्यात ते बोलत होते.


यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, पॉन्झी कंपन्यांचे एजंट त्यांच्या योजना अतिशय आकर्षक पद्धतीने मांडायचे आणि मीही त्यांच्या गोष्टीत येऊन गुंतवणूक केली, पण शेवटपर्यंत मला माझे पैसे मिळू शकले नाहीत असे माझी यांनी सांगितले. चिटफंडच्या नावाखाली 1990 आणि 2002 मध्ये दोन पॉन्झी कंपन्यांनी माझी फसवणूक केली. मी त्या योजनांमध्ये पैसे जमा केले, परंतु जेव्हा मॅच्योरिटीची वेळ आली तेव्हा त्या कंपन्या गायब झाल्या.



त्यानंतर फसवणूक झालेले पैसे परत मिळण्याची प्रक्रिया इतकी लांब आणि कठीण होती. त्यामुळे आपण पैसे परत घेऊ शकलो नाही. यासोबतच कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्यावी आणि पॉन्झी कंपन्यांच्या फंदात पडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी केले. तसेच, अशी फसवणूक थांबवण्यासाठी जनजागृती आणि दक्षता आवश्यक आहे. कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित ठेवणे हे आमचे प्राधान्य असले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, सध्या परिस्थिती खूप बदलली आहे. चिट फंड घोटाळे थांबवण्यासाठी आणि ग्राहकांची फसवणूक होण्यापासून वाचवण्यासाठी केंद्राने आता कडक कायदे केले आहेत आणि नियम मजबूत केले आहेत. हे पाऊल ग्राहकांना संरक्षण देण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी (Mohan Charan Majhi) सांगितले.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )