Vande Bharat Express : अरे बापरे! जायचं होतं गोव्याला, पण पोहोचली कल्याणला

वंदे भारत एक्स्प्रेस मार्ग भटकताच हडबडली रेल्वेची सुरक्षा यंत्रणा


मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मडगावपर्यंत धावणारी देशातील आधुनिक ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात हरवली. दिवा स्थानकातून ही गाडी पनवेलकडे जाण्याऐवजी कल्याणच्या दिशेने वळली. दरम्यान मार्ग बदलल्याचे लक्षात येताच रेल्वेची सुरक्षा यंत्रणा हडबडली. दरम्यान ही गाडी घाईघाईने कल्याण स्थानकावर नेण्यात आली. तेथून काही वेळाने ही गाडी पुन्हा दिवा स्थानकात परतली आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरू ठेवला. या बिघाडामुळे ट्रेन ९० मिनिटे उशिराने पोहोचली.


रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी दिवा-पनवेल मार्गावर जाणार होती, जो कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी नियुक्त मार्ग आहे. मात्र ही गाडी सकाळी ६:१०वाजता दिवा स्थानकाच्या पुढे कल्याणच्या दिशेने वळली. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिग्नलमधील त्रुटीमुळे हा गोंधळ उघडकीस आला आहे. वास्तविक, दिवा जंक्शन येथे डाउन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईन दरम्यान पॉइंट क्रमांक १०३ वर सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाला.



त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई लोकल ट्रेन सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अनियमितता समोर आल्यानंतर ही गाडी कल्याण स्थानकात नेण्यात आली आणि काही वेळानंतर ही गाडी दिव्याला परत पाठवण्यात आली. दिवा येथे पोहोचल्यानंतर ही गाडी दिवा-पनवेल या निश्चित मार्गाने मडगावकडे रवाना झाली.



सुमारे ३५ मिनिटे थांबली होती ट्रेन


मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेस दिवा जंक्शनवर सकाळी ६:१० ते ७:४५ या वेळेत सुमारे ३५ मिनिटे ट्रेन थांबवण्यात आली होती. ते म्हणाले की, गाडी पाचव्या मार्गाने सायंकाळी ७.०४ वाजता कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर पोहोचली आणि सहाव्या मार्गाने सायंकाळी ७.१३ वाजता पुन्हा दिवा स्थानकात आणण्यात आली. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन जून २०२३ मध्ये सीएसएमटी-मडगाव या मार्गावर सुरू करण्यात आली होती. नियोजित वेळापत्रकानुसार ही गाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून पहाटे ५.२५ वाजता सुटते आणि त्याच दिवशी दुपारी १.१० वाजता गोव्यातील मडगावला पोहोचते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई उपनगरीय स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा जोरदार मजबूत आहे. त्यामुळे येथे अशा घटना फार कमी आहेत.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा