Hair Care: चमकदार केसांसाठी वापरा हे घरगुती उपाय

मुंबई: थंडीच्या दिवसांत इतरांप्रमाणेच तुमचे केसही(Hair Care) कोरडे आणि निस्तेज होतात का? या अशा रुक्ष केसांमुळे तुमच्या पर्सनॅलिटीवर परिणाम होतो. सोबतच केस गळूही लागतात. तापमानाचा पारा घसरताच केसांतील ओलावाही कमी होऊ लागतो. यामुळे ते रुक्ष, निस्तेज बनू लागतात. यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून तुमचे केस चमकदार बनवू शकता.



गरम तेलाचा वापर करा


केस धुण्याच्या एक तास आधी आपल्या केसांना तेलाचे पोषण द्या. केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल, नारळाचे तेल कोमट करून घ्या.



केमिकल फ्री उत्पादने


हलक्या शाम्पूचा वापर करा. जे शँपू सल्फेट आणि पॅराबेन फ्री असतील त्यांचा वापर करा. हेअर कंडिशनरचा वापर करा. यामुळे केसांना मॉश्चरायजेशन मिळेल. केस सतत कलर करू नका अथवा हानिकारक केमिकल्सचा वापर करू नका.



गरम पाण्याचा वापर नको


तुमचे केस गरम पाण्याने धुण्याऐवजी कोमट पाण्याने धुवा. थंड पाण्याने आंघोळ करणे सगळ्यात चांगले असते. केसांतील ओलावा कायम राहण्यास मदत होते.



हीट स्टायलिंग कमी करा


केसांना कुरळे, सरळ अथवा व्हॉल्यूम देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हीट स्टायलरचा वापर सतत करू नका. यामुळे केस निस्तेज आणि कोरडे होतात.



केस दररोज धुवू नका


तुमच्या केसांमधून घाण आणि घाम घालवण्यासाठी तुम्ही जर सतत केस धुवत असाल तर ते बंद करा. यामुळे केसांतील नैसर्गिक तेल संपून जाते. आठवड्यातून तीन वेळा केस धुण्याचा सल्ला दिला जातो.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि