Hair Care: चमकदार केसांसाठी वापरा हे घरगुती उपाय

मुंबई: थंडीच्या दिवसांत इतरांप्रमाणेच तुमचे केसही(Hair Care) कोरडे आणि निस्तेज होतात का? या अशा रुक्ष केसांमुळे तुमच्या पर्सनॅलिटीवर परिणाम होतो. सोबतच केस गळूही लागतात. तापमानाचा पारा घसरताच केसांतील ओलावाही कमी होऊ लागतो. यामुळे ते रुक्ष, निस्तेज बनू लागतात. यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून तुमचे केस चमकदार बनवू शकता.



गरम तेलाचा वापर करा


केस धुण्याच्या एक तास आधी आपल्या केसांना तेलाचे पोषण द्या. केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल, नारळाचे तेल कोमट करून घ्या.



केमिकल फ्री उत्पादने


हलक्या शाम्पूचा वापर करा. जे शँपू सल्फेट आणि पॅराबेन फ्री असतील त्यांचा वापर करा. हेअर कंडिशनरचा वापर करा. यामुळे केसांना मॉश्चरायजेशन मिळेल. केस सतत कलर करू नका अथवा हानिकारक केमिकल्सचा वापर करू नका.



गरम पाण्याचा वापर नको


तुमचे केस गरम पाण्याने धुण्याऐवजी कोमट पाण्याने धुवा. थंड पाण्याने आंघोळ करणे सगळ्यात चांगले असते. केसांतील ओलावा कायम राहण्यास मदत होते.



हीट स्टायलिंग कमी करा


केसांना कुरळे, सरळ अथवा व्हॉल्यूम देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हीट स्टायलरचा वापर सतत करू नका. यामुळे केस निस्तेज आणि कोरडे होतात.



केस दररोज धुवू नका


तुमच्या केसांमधून घाण आणि घाम घालवण्यासाठी तुम्ही जर सतत केस धुवत असाल तर ते बंद करा. यामुळे केसांतील नैसर्गिक तेल संपून जाते. आठवड्यातून तीन वेळा केस धुण्याचा सल्ला दिला जातो.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण