Governor VK Singh : माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह मिझोरमचे राज्यपाल

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील पाच राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे. राज्यपाल नियुक्तीचा आदेश मंगळवार २४ डिसेंबर रोजी रात्री काढण्यात आला. या आदेशानुसार माजी लष्करप्रमुख आणि केंद्र सरकारचे माजी राज्यमंत्री व्ही. के. सिंह मिझोरमचे राज्यपाल झाले. गृह मंत्रालयाचे माजी सचिव अजयकुमार भल्ला मणिपूरचे राज्यपाल झाले. मणिपूरमध्ये हिंदू मैतेई आणि ख्रिश्चन कुकी यांच्यात संघर्ष सुरू आहे. नवे राज्यपाल नियुक्त झाल्यानंतर हा संघर्ष सोडवण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काही प्रयत्न होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.



केरळ आणि बिहार या दोन राज्यांच्या राज्यपालांची अदलाबदल झाली आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद आता बिहारचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तर बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आता केरळचे राज्यपाल म्हणून कार्यरत होणार आहेत. ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.मिझोरमचे विद्यमान राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभामपती यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.
Comments
Add Comment

पीएम मोदी 'ॲक्शन मोड'मध्ये! भूतानमधून येताच केली बॉम्बस्फोटातील जखमींची विचारपूस, सायंकाळी तातडीची CCS बैठक

सुरक्षेवरील कॅबिनेट समितीच्या बैठकीकडे देशाचे लक्ष नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (१२ नोव्हेंबर,

Delhi Blast : दिल्ली नव्हे, तर राम मंदिर टार्गेट होतं, लाल किल्ला स्फोटाच्या चौकशीत हादरवणारा खुलासा; दहशतवाद्यांनी राम मंदिरावर...

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) स्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला असून, अनेक

लाल किल्ला ब्लास्ट : 'आत्मघाती' नव्हे, 'अपघाती' स्फोट; तपास कुठे पोहोचला? १० पॉइंट्समध्ये जाणून घ्या

नवी दिल्ली : भारताची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण

एक पोस्टर आणि जम्मू काश्मीर पोलीसांनी केला कट्टरपंथी व्यावसायिकांच्या व्हाईट कॉलर दहशतवादाचा पर्दाफाश! जाणून घ्या सविस्तर घटनाक्रम

नवी दिल्ली: राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कला उध

धरमशाला येथे २१ महिन्यांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० सामना

नवीन विंटर राई ग्रासने स्टेडियम सजवले धरमशाला : हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनला जवळजवळ २१ महिन्यांनंतर

दिल्ली स्फोटानंतर कोलकातामध्ये सुरक्षा वाढवली

कोलकाता :  दिल्ली बॉम्बस्फोटांनंतर, कोलकाता पोलिसांनी ईडन गार्डन्स स्टेडियमवरील सुरक्षा वाढवली आहे आणि भारतीय