Governor VK Singh : माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह मिझोरमचे राज्यपाल

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील पाच राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे. राज्यपाल नियुक्तीचा आदेश मंगळवार २४ डिसेंबर रोजी रात्री काढण्यात आला. या आदेशानुसार माजी लष्करप्रमुख आणि केंद्र सरकारचे माजी राज्यमंत्री व्ही. के. सिंह मिझोरमचे राज्यपाल झाले. गृह मंत्रालयाचे माजी सचिव अजयकुमार भल्ला मणिपूरचे राज्यपाल झाले. मणिपूरमध्ये हिंदू मैतेई आणि ख्रिश्चन कुकी यांच्यात संघर्ष सुरू आहे. नवे राज्यपाल नियुक्त झाल्यानंतर हा संघर्ष सोडवण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काही प्रयत्न होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.



केरळ आणि बिहार या दोन राज्यांच्या राज्यपालांची अदलाबदल झाली आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद आता बिहारचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तर बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आता केरळचे राज्यपाल म्हणून कार्यरत होणार आहेत. ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.मिझोरमचे विद्यमान राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभामपती यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.
Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली