Governor VK Singh : माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह मिझोरमचे राज्यपाल

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील पाच राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे. राज्यपाल नियुक्तीचा आदेश मंगळवार २४ डिसेंबर रोजी रात्री काढण्यात आला. या आदेशानुसार माजी लष्करप्रमुख आणि केंद्र सरकारचे माजी राज्यमंत्री व्ही. के. सिंह मिझोरमचे राज्यपाल झाले. गृह मंत्रालयाचे माजी सचिव अजयकुमार भल्ला मणिपूरचे राज्यपाल झाले. मणिपूरमध्ये हिंदू मैतेई आणि ख्रिश्चन कुकी यांच्यात संघर्ष सुरू आहे. नवे राज्यपाल नियुक्त झाल्यानंतर हा संघर्ष सोडवण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काही प्रयत्न होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.



केरळ आणि बिहार या दोन राज्यांच्या राज्यपालांची अदलाबदल झाली आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद आता बिहारचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तर बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आता केरळचे राज्यपाल म्हणून कार्यरत होणार आहेत. ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.मिझोरमचे विद्यमान राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभामपती यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.
Comments
Add Comment

आधार कार्ड संदर्भात ५ नवीन नियम लागू! तुमचे कार्ड लगेच तपासा

१० वर्षांवरील आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य; वडिल-पतीचे नाव हटवले, 'बायोमेट्रिक' अपडेटसाठी शुल्क वाढले मुंबई:

चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात मोठी दुर्घटना; ९ कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईजवळील उत्तर चेन्नई औष्णिक वीज केंद्राच्या बांधकाम ठिकाणी आज एक भीषण

'ड्रायव्हरलेस' रिक्षा भारतात दाखल! या रिक्षाची किंमत किती आणि कुठे चालणार ही रिक्षा, पहा..

मुंबई: भारतीय वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकत ओमेगा सेकी मोबिलिटीने (OSM) जगातील पहिली चालकरहित

भारतामधून कोणत्या शेजारील देशांमध्ये रेल्वे धावते? प्रवासासाठी 'हे' पुरावे आवश्यक

नवी दिल्ली: भारतामधून काही शेजारील देशांमध्ये रेल्वेने प्रवास करणे शक्य आहे, ज्यामुळे ग्रामीण सौंदर्याचा

VK Karur Stampede : विजय थलापतीला अटक होणार? करूर चेंगराचेंगरी प्रकरणात टीव्हीके जिल्हा सचिवांना बेड्या; पोलिसांची मोठी कारवाई

करूर : अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापती एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

'अमेरिकेच्या दबावापोटी यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधात कारवाई टाळली'

नवी दिल्ली : मुंबईवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला. या मोठ्या प्रमाणात