Bank Holiday : बँकांचे कामकाज तीन दिवस राहणार बंद

  158

मुंबई : महाराष्ट्रात तीन दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. ग्राहकांनी या सुट्या लक्षात ठेवून बँकेशी संबंधित कामांचे नियोजन करावे, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे.


आज मंगळवार २४ डिसेंबर आहे आणि वर्ष पुढल्या आठवड्यात मंगळवार ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे. या कालावधीत महाराष्ट्रात तीन दिवस बँकांचे कामकाज बंद असेल. राज्यात बुधवार २५ डिसेंबर रोजी नाताळ अर्थात ख्रिसमस निमित्त बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. यानंतर २८ डिसेंबर रोजी चौथा शनिवार म्हणून नियमानुसार बँकांचे कामकाज बंद असेल. नंतर २९ डिसेंबर रोजी रविवार म्हणून नियमानुसार बँकांचे कामकाज बंद असेल. यामुळे वर्ष संपण्याच्या सुमारास राज्यात बँकांचे कामकाज बुधवार २५ डिसेंबर, शनिवार २८ डिसेंबर आणि रविवार २९ डिसेंबर असे तीन दिवस बंद राहणार आहे. बँकांचे कामकाज बंद राहणार असले तरी एटीएम सेवा, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सुरू राहणार आहे. यामुळे बँकेत न जाता दैनंदिन आर्थिक व्यवहार करणाऱ्या कोट्यवधी बँक ग्राहकांचे काम विना अडथळा सुरू राहणार आहे.


बँकांचे कामकाज 'या' दिवशी बंद राहणार




  1. बुधवार २५ डिसेंबर २०२४ - नाताळ अर्थात ख्रिसमस निमित्त सुटी

  2. शनिवार २८ डिसेंबर २०२४ - चौथा शनिवार, सुटी

  3. रविवार २९ डिसेंबर २०२४ - रविवारची सुटी

Comments
Add Comment

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग