Bank Holiday : बँकांचे कामकाज तीन दिवस राहणार बंद

मुंबई : महाराष्ट्रात तीन दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. ग्राहकांनी या सुट्या लक्षात ठेवून बँकेशी संबंधित कामांचे नियोजन करावे, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे.


आज मंगळवार २४ डिसेंबर आहे आणि वर्ष पुढल्या आठवड्यात मंगळवार ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे. या कालावधीत महाराष्ट्रात तीन दिवस बँकांचे कामकाज बंद असेल. राज्यात बुधवार २५ डिसेंबर रोजी नाताळ अर्थात ख्रिसमस निमित्त बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. यानंतर २८ डिसेंबर रोजी चौथा शनिवार म्हणून नियमानुसार बँकांचे कामकाज बंद असेल. नंतर २९ डिसेंबर रोजी रविवार म्हणून नियमानुसार बँकांचे कामकाज बंद असेल. यामुळे वर्ष संपण्याच्या सुमारास राज्यात बँकांचे कामकाज बुधवार २५ डिसेंबर, शनिवार २८ डिसेंबर आणि रविवार २९ डिसेंबर असे तीन दिवस बंद राहणार आहे. बँकांचे कामकाज बंद राहणार असले तरी एटीएम सेवा, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सुरू राहणार आहे. यामुळे बँकेत न जाता दैनंदिन आर्थिक व्यवहार करणाऱ्या कोट्यवधी बँक ग्राहकांचे काम विना अडथळा सुरू राहणार आहे.


बँकांचे कामकाज 'या' दिवशी बंद राहणार




  1. बुधवार २५ डिसेंबर २०२४ - नाताळ अर्थात ख्रिसमस निमित्त सुटी

  2. शनिवार २८ डिसेंबर २०२४ - चौथा शनिवार, सुटी

  3. रविवार २९ डिसेंबर २०२४ - रविवारची सुटी

Comments
Add Comment

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

सरत्या वर्षाला द्या निरोप , प्रियजनांना द्या २०२६ नववर्षाच्या हटके शुभेच्छा!

आज संपूर्ण जगभरात मध्यरात्री सर्वजण सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. २०२६ नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. सरत्या

‘हॅप्पी न्यू इयर’चा एक मेसेज करू शकतो बँक खाते रिकामे

सफाळे पोलिसांकडून सायबर स्कॅमबाबत हाय अलर्ट सफाळे : नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र असतानाच, सायबर

भाजप जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्षांना संधी

संघटनातील अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती