PM Rojgar Mela 2024 : पंतप्रधानांच्या हस्ते ७१ हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप

नवी दिल्ली : कुवैत दौऱ्यावरून परतताच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले. भारतातील तरुणांची क्षमता आणि प्रतिभा यांचा पुरेपूर वापर करणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी सांगितले.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्यानिमित्त तरूणांना संबोधित करताना सांगितले की, आज देशातील हजारो तरुणांच्या आयुष्याची नवी सुरुवात होत आहे. तुमचे वर्षानुवर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अनेक वर्षे केलेल्या मेहनतीला यश आले आहे. वर्तमान २०२४ हे सरणारे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन आनंद देणारे आहे. मी तुम्हा सर्व तरुणांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो, असे मोदी म्हणाले. गेल्या दीड वर्षात सरकारने सुमारे १० लाख तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. जी शिक्षणपद्धती पूर्वी निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांवर ओझे असायची, ती आता त्यांना नवे पर्याय देत आहे. अटल टिंकरिंग लॅब आणि आधुनिक पीएम श्री शाळांच्या माध्यमातून लहानपणापासूनच नाविन्यपूर्ण मानसिकता आकाराला येत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.





रोजगार मेळावा हा पंतप्रधान यांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. हा उपक्रम युवकांना राष्ट्रनिर्माणाबरोबरच आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून देईल. हा रोजगार मेळावा देशभरातील ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी भरती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारख्या विविध मंत्रालये/विभागांमध्ये नियुक्त होतील.

Comments
Add Comment

'टायटॅनिक पोज' आणि 'उभं राहून बाईक' चालवणं पडलं महागात! मानसी पारेख आणि टिकू तल्सानियावर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल

अहमदाबाद : अभिनेत्री मानसी पारेख (Manasi Parekh) आणि ज्येष्ठ अभिनेते टिकू तल्सानिया (Tiku Talsania) यांच्यावर अहमदाबादच्या

Mamta kulkarni : वाद वाढताच ममता कुलकर्णीचा 'यू-टर्न'; 'दाऊद दहशतवादी नाही' म्हणणारी अभिनेत्री आता म्हणाली...

'मी दाऊदबद्दल नाही, तर विकी गोस्वामीबद्दल बोलत होते...  अभिनयक्षेत्रातून अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय