PM Rojgar Mela 2024 : पंतप्रधानांच्या हस्ते ७१ हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप

नवी दिल्ली : कुवैत दौऱ्यावरून परतताच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले. भारतातील तरुणांची क्षमता आणि प्रतिभा यांचा पुरेपूर वापर करणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी सांगितले.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्यानिमित्त तरूणांना संबोधित करताना सांगितले की, आज देशातील हजारो तरुणांच्या आयुष्याची नवी सुरुवात होत आहे. तुमचे वर्षानुवर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अनेक वर्षे केलेल्या मेहनतीला यश आले आहे. वर्तमान २०२४ हे सरणारे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन आनंद देणारे आहे. मी तुम्हा सर्व तरुणांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो, असे मोदी म्हणाले. गेल्या दीड वर्षात सरकारने सुमारे १० लाख तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. जी शिक्षणपद्धती पूर्वी निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांवर ओझे असायची, ती आता त्यांना नवे पर्याय देत आहे. अटल टिंकरिंग लॅब आणि आधुनिक पीएम श्री शाळांच्या माध्यमातून लहानपणापासूनच नाविन्यपूर्ण मानसिकता आकाराला येत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.





रोजगार मेळावा हा पंतप्रधान यांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. हा उपक्रम युवकांना राष्ट्रनिर्माणाबरोबरच आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून देईल. हा रोजगार मेळावा देशभरातील ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी भरती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारख्या विविध मंत्रालये/विभागांमध्ये नियुक्त होतील.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला