PM Rojgar Mela 2024 : पंतप्रधानांच्या हस्ते ७१ हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप

  68

नवी दिल्ली : कुवैत दौऱ्यावरून परतताच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले. भारतातील तरुणांची क्षमता आणि प्रतिभा यांचा पुरेपूर वापर करणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी सांगितले.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्यानिमित्त तरूणांना संबोधित करताना सांगितले की, आज देशातील हजारो तरुणांच्या आयुष्याची नवी सुरुवात होत आहे. तुमचे वर्षानुवर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अनेक वर्षे केलेल्या मेहनतीला यश आले आहे. वर्तमान २०२४ हे सरणारे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन आनंद देणारे आहे. मी तुम्हा सर्व तरुणांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो, असे मोदी म्हणाले. गेल्या दीड वर्षात सरकारने सुमारे १० लाख तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. जी शिक्षणपद्धती पूर्वी निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांवर ओझे असायची, ती आता त्यांना नवे पर्याय देत आहे. अटल टिंकरिंग लॅब आणि आधुनिक पीएम श्री शाळांच्या माध्यमातून लहानपणापासूनच नाविन्यपूर्ण मानसिकता आकाराला येत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.





रोजगार मेळावा हा पंतप्रधान यांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. हा उपक्रम युवकांना राष्ट्रनिर्माणाबरोबरच आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून देईल. हा रोजगार मेळावा देशभरातील ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी भरती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारख्या विविध मंत्रालये/विभागांमध्ये नियुक्त होतील.

Comments
Add Comment

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा