अरे व्वा! आता रेल्वेच्या काश्मीर प्रवासात मिळणार गरम पाणी, गरम हवा!

पुढील महिन्यात सुरु होणार या दोन नवीन ट्रेन


नवी दिल्ली : देशात सेमी हायस्पीड असलेली वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या पसंतीला उतरली. या ट्रेनची मागणी वाढत असताना रेल्वेकडून आणखी दोन वेगळ्या ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांना हिवाळ्यातील थंडीचा त्रास होणार नाही. या ट्रेन पुढील महिन्यापासून सुरु होणार आहेत. सेंट्रली हिटेड स्लीपर ट्रेन असे त्या ट्रेनचे नाव असून नवी दिल्ली ते काश्मीर असा प्रवास या ट्रेन करणार आहेत.


काश्मीरात जाणा-या या दोन्ही ट्रेनमध्ये जबरदस्त सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. त्यात गरम हवेपासून गरम पाणीपर्यंत सुविधा दिली जाणार आहे. यामुळे काश्मीरच्या थंड वातावरणात उबदार वातावरण रेल्वे प्रवाशांना मिळणार आहे.


अधिकाऱ्याने सांगितले की, लोको पायलटसाठी पुढील काच खास एम्बेडेड हिटिंग एलिमेंटसह डिझाइन करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेमध्ये पहिल्यांदाच या तंत्राचा वापर करण्यात आला आहे. तापमान शून्य अंशांच्या खाली गेले तरी समोरच्या काचेवर बर्फ तयार होणार नाही.


पहिली ट्रेन नवी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान धावणार आहे. ही ट्रेन सुरु झाल्यामुळे जम्मू ते श्रीनगर जाण्यासाठी आता वेगळी ट्रेन बदलावी लागणार नाही. ही ट्रेन दिल्ली ते श्रीनगर हे अंतर १३ तासांत पूर्ण करणार आहे. ही ट्रेन ३५९ मीटर उंच चेनाब पुलावरुन जाणार आहे.



दुसरी ट्रेन आठ कोचची असणार आहे. ही ट्रेन टेअर कार सीटींगची असणार आहे. कटरा आणि बारामुल्ला दरम्यान ही रेल्वे धावणार आहे. कटरा आणि बारामुल्ला हे २४६ किलोमीटरचे अंतर ही रेल्वे केवळ दहा तासांत पूर्ण करणार आहे. त्यासाठी फक्त साडे तीन तास लागणार आहेत. बसने हा प्रवास १० तासांचा आहे.


सेंट्रली हिटेड स्लीपर ट्रेनमध्ये विशेष सुविधांचाही समावेश आहे. त्यात पाण्याच्या टाक्यांसाठी सिलिकॉन हिटिंग पॅड असणार आहे. त्यामुळे थंडीपासून संरक्षण होईल. या परिस्थितीत प्रवाशांना ट्रेनमध्ये गरम पाणी मिळणार आहे. या ट्रेनच्या टॉयलेटसाठी डक्ट खास डिझाईन करण्यात आला आहे. जेणेकरून त्यात गरम हवा येत राहते.

Comments
Add Comment

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि