अरे व्वा! आता रेल्वेच्या काश्मीर प्रवासात मिळणार गरम पाणी, गरम हवा!

पुढील महिन्यात सुरु होणार या दोन नवीन ट्रेन


नवी दिल्ली : देशात सेमी हायस्पीड असलेली वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या पसंतीला उतरली. या ट्रेनची मागणी वाढत असताना रेल्वेकडून आणखी दोन वेगळ्या ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांना हिवाळ्यातील थंडीचा त्रास होणार नाही. या ट्रेन पुढील महिन्यापासून सुरु होणार आहेत. सेंट्रली हिटेड स्लीपर ट्रेन असे त्या ट्रेनचे नाव असून नवी दिल्ली ते काश्मीर असा प्रवास या ट्रेन करणार आहेत.


काश्मीरात जाणा-या या दोन्ही ट्रेनमध्ये जबरदस्त सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. त्यात गरम हवेपासून गरम पाणीपर्यंत सुविधा दिली जाणार आहे. यामुळे काश्मीरच्या थंड वातावरणात उबदार वातावरण रेल्वे प्रवाशांना मिळणार आहे.


अधिकाऱ्याने सांगितले की, लोको पायलटसाठी पुढील काच खास एम्बेडेड हिटिंग एलिमेंटसह डिझाइन करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेमध्ये पहिल्यांदाच या तंत्राचा वापर करण्यात आला आहे. तापमान शून्य अंशांच्या खाली गेले तरी समोरच्या काचेवर बर्फ तयार होणार नाही.


पहिली ट्रेन नवी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान धावणार आहे. ही ट्रेन सुरु झाल्यामुळे जम्मू ते श्रीनगर जाण्यासाठी आता वेगळी ट्रेन बदलावी लागणार नाही. ही ट्रेन दिल्ली ते श्रीनगर हे अंतर १३ तासांत पूर्ण करणार आहे. ही ट्रेन ३५९ मीटर उंच चेनाब पुलावरुन जाणार आहे.



दुसरी ट्रेन आठ कोचची असणार आहे. ही ट्रेन टेअर कार सीटींगची असणार आहे. कटरा आणि बारामुल्ला दरम्यान ही रेल्वे धावणार आहे. कटरा आणि बारामुल्ला हे २४६ किलोमीटरचे अंतर ही रेल्वे केवळ दहा तासांत पूर्ण करणार आहे. त्यासाठी फक्त साडे तीन तास लागणार आहेत. बसने हा प्रवास १० तासांचा आहे.


सेंट्रली हिटेड स्लीपर ट्रेनमध्ये विशेष सुविधांचाही समावेश आहे. त्यात पाण्याच्या टाक्यांसाठी सिलिकॉन हिटिंग पॅड असणार आहे. त्यामुळे थंडीपासून संरक्षण होईल. या परिस्थितीत प्रवाशांना ट्रेनमध्ये गरम पाणी मिळणार आहे. या ट्रेनच्या टॉयलेटसाठी डक्ट खास डिझाईन करण्यात आला आहे. जेणेकरून त्यात गरम हवा येत राहते.

Comments
Add Comment

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या