प्रहार    

Atal Bihari Wajpeyi : अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन साजरा करण्याचे आवाहन

  121

Atal Bihari Wajpeyi : अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन साजरा करण्याचे आवाहन नांदेड : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस २५ डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी सार्वजनिक सुट्टी असली तरी त्या दिवशी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपाचे आयुक्त, पोलीस अधिक्षक व जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना निर्देश देण्यात आले आहेत. हा दिवस सुशासन दिन म्हणून पाळण्यात यावा. या काळामध्ये वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात यावा.

जिल्हा प्रमुख व अधिनस्त कार्यालयांनी या सुशासन दिनाच्या निमित्ताने सेवा प्रशासनास उपयुक्त अशा बाबीसंदर्भात विविध उपक्रम राबविण्यात यावेत. जसे माहितीचा अधिकार प्रशिक्षण, प्रशासनातील उत्कृष्ट संकल्पनांचे सादरीकरण, सेवाविषयक प्रशिक्षण इ., तणाव मुक्ती व्यवस्थापन, सेवा हमी कायद्याची अंमलबजाणी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
Comments
Add Comment

आळंदीत इंद्रायणीला पूर, जुना पूल आणि घाटावर जाण्यास बंदी

आळंदी : मुसळधार पावसामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीतील इंद्रायणी नदीला पूर आला आहे. मंदिराच्या दिशेने

Jalgoan News : शेतात कामाला गेले अन् ५ जीव परतलेच नाहीत, एरंडोल तालुक्यातील भीषण घटना”, काय घडलं नेमकं?

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खेडी गाव हादरवून टाकणारी घटना घडली आहे. गावाजवळील शेतात एकाच

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पुण्यात पावसाचा जोर वाढला, भिडे पूल वाहतुकीसाठी बंद, रेड अलर्ट जारी

गेल्या तीन दिवसापासून पुणे जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खडकवासला

राज्यात पावसामुळे १० लाख एकर शेती पाण्याखाली - अजित पवार

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज

राज्यात पावसाचा हाहाकार, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट; शाळांना सुट्टी

मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे. मुंबईसह कोकण,