बहिणीसोबत बोलला म्हणून कोयत्याने केली हत्या

पुणे : बारामती येथे आत्येबहिणी सोबत बोलण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाचा धारदार कोयत्याने हल्ला करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अवघ्या १३ तासात अटक केली आहे.


बारामती शहरातील प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी कडून टीसी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर १९ डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास एका युवकाचा धारदार कोयत्याने जीव घेणा हल्ला करून खून करण्यात आला होता. यात अनिकेत सदाशिव गजाकस (वय, २३ रा. देसाई इस्टेट बारामती) या २३ वर्षीय युवकाचा खून झाला होता. या प्रकरणातील नंदकिशोर पंजाबराव अंभोरे, (रा शेळके वस्ती तांदुळवाडी, बारामती) महेश नंदकुमार खंडाळे (रा. यदुपाटील नगर, तांदुळवाडी, बारामती), संग्राम दत्तात्रेय खंडाळे (रा. शेळकेवस्ती, तांदुळवाडी, बारामती) यांना पोलिसांनी १३ तासांत अटक केली आहे.



घटनेची अधिक माहिती अशी की, मयत अनिकेत व आरोपींमध्ये याआधीही आपापसात वाद झाले होते. मयत अनिकेत हा आरोपी नंदकिशोर अंभोरे याच्या आत्येबहिणी सोबत बोलण्याच्या कारणावरून वाद झाला होता. याचाच बदला घेण्यासाठी वरील तीनही आरोपींनी १९ डिसेंबरच्या रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून येत अनिकेत याच्यावर कोयत्याने हल्ला चढवत ठार केले.

Comments
Add Comment

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील

मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही "मुंबई फास्ट, महाराष्ट्र

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर ' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती

Winter Session : पाच वर्षे एकही योजना बंद करणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार मुंबई : “निवडणुका