बहिणीसोबत बोलला म्हणून कोयत्याने केली हत्या

पुणे : बारामती येथे आत्येबहिणी सोबत बोलण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाचा धारदार कोयत्याने हल्ला करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अवघ्या १३ तासात अटक केली आहे.


बारामती शहरातील प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी कडून टीसी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर १९ डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास एका युवकाचा धारदार कोयत्याने जीव घेणा हल्ला करून खून करण्यात आला होता. यात अनिकेत सदाशिव गजाकस (वय, २३ रा. देसाई इस्टेट बारामती) या २३ वर्षीय युवकाचा खून झाला होता. या प्रकरणातील नंदकिशोर पंजाबराव अंभोरे, (रा शेळके वस्ती तांदुळवाडी, बारामती) महेश नंदकुमार खंडाळे (रा. यदुपाटील नगर, तांदुळवाडी, बारामती), संग्राम दत्तात्रेय खंडाळे (रा. शेळकेवस्ती, तांदुळवाडी, बारामती) यांना पोलिसांनी १३ तासांत अटक केली आहे.



घटनेची अधिक माहिती अशी की, मयत अनिकेत व आरोपींमध्ये याआधीही आपापसात वाद झाले होते. मयत अनिकेत हा आरोपी नंदकिशोर अंभोरे याच्या आत्येबहिणी सोबत बोलण्याच्या कारणावरून वाद झाला होता. याचाच बदला घेण्यासाठी वरील तीनही आरोपींनी १९ डिसेंबरच्या रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून येत अनिकेत याच्यावर कोयत्याने हल्ला चढवत ठार केले.

Comments
Add Comment

'UP पॅटर्न'चा धसका! नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या 'बुलडोझर ॲक्शन'ची जोरदार चर्चा

अवैध बांधकामे, गुन्हेगारी अड्डे जमीनदोस्त; "गुन्हेगारांना माफी नाही, कायदा सर्वांसाठी समान" – मुख्यमंत्र्यांचे

Maharashtra Weather Update : पुढील ७२ तासांत राज्यावर कोणते मोठे संकट? प्रशासनाचा स्पष्ट इशारा; 'अति महत्वाचं काम' म्हणजे नेमकं काय?

काही दिवसांपूर्वीच राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा मोठा कहर आणि अतिवृष्टी अनुभवल्यानंतर, आता भारतीय हवामान

Devendra Fadanvis : ब्रेकिंग पुणे! केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्र्यांच्या मंचावर सापाचा शिरकाव; सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ

पुणे : पिंपरी-चिंचवडजवळच्या किवळे (Kiwale) येथील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये आज दुहेरी

गुन्हेगारी स्टाईलने 'रिल्स' बनवणा-याला दिला पोलिसांनी दणका

पुणे : दिवाळीच्या उत्सवात सोशल मीडियावर विविध प्रकारच्या जाहिराती येत असतात. अनेकजण आपल्या व्यवसायाच्या

ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणींसमोर अडचणींचा डोंगर!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले

पूरग्रस्त सोलापूर आणि बीड जिल्ह्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनकडून मदतीचा हात

सोलापूर : मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे त्रस्त झालेल्या सुमारे चार हजार