Virat Anushka : विराट अनुष्का लवकरच भारत सोडून लंडनला शिफ्ट होणार

कॅनबेरा : भारतीय संघातील नामवंत क्रिकेटपटू विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. सध्या तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळत असून तिसऱ्या कसोटीत तो फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. याचदरम्यान विराट कोहली भारत सोडणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहली हा पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन मुलांसह लंडनला शिफ्ट होणार आहे, अशी माहिती आता विराट कोहलीचे लहानपणीचे क्रिकेट प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी दिली आहे.



विराट आणि अनुष्का लंडनला शिफ्ट होणार याची चर्चा खूप दिवसांपासून सुरु आहे, मात्र याबाबत ठोस आणि अधिक माहिती समोर आली नव्हती. मात्र प्रथमच याबाबत कोहलीच्या जवळच्या व्यक्तीने खुलासा केला केला आहे. एका मुलाखती दम्यान प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना विराट कोहली कायमचा भारत सोडून परदेशात राहण्याचा विचार करत आहे का? यावर उत्तर देताना प्रशिक्षक म्हणाले, "हो, विराट आपल्या मुलांसह आणि पत्नी अनुष्का सह लंडनमध्ये शिफ्ट होण्याचं प्लॅनिंग करत आहे. तो लवकरच भारत सोडून तिथे शिफ्ट होणार आहे. कोहली सध्या क्रिकेट व्यतिरिक्त जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवत आहे. तसेच पुढे बोलताना प्रशिक्षक म्हणाले ककी, विराट अजूनही तंदुरुस्त आहे आणि निवृत्ती घेण्याचे त्याचे वय झालेले नाही. मला वाटते की तो आणखी पाच वर्षे खेळेल. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात तो भारताकडून नक्कीच खेळेल. मी त्याला गेल्या २६ वर्षांपासून ओळखतो आणि म्हणूनच मी म्हणू शकतो की त्याच्यामध्ये अजूनही खूप क्रिकेट शिल्लक आहे.


विराट कोहली सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळत आहे. मालिकेतील पहिल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये मोठी खेळी म्हणून त्याच्या बॅटमधून फक्त १  शतक झळकले आहे. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने नाबाद १००  धावा केल्या. या एका शतकासह त्याने ३  कसोटी सामन्यांच्या ५  डावात १२६  धावा केल्या आहेत. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७  साली विराट-अनुष्काने लग्न केलं. २०२१ मध्ये त्यांची मुलगी वामिकाचा जन्म झाला तर यावर्षी फेब्रुवारीमध्ये
(२०२४) मुलगा अकायचा जन्म झाला. त्यानंतर ते दोघं बऱ्याच वेळेस लंडनमध्ये दिसले आहेत. त्यामुळे लवकरच विराट भारत सोडून तिथे स्थायिक होणार आहे, अशी मोठी माहिती राजकुमार शर्मा यांनी दिली. त्यामुळे विराटच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.
Comments
Add Comment

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

मुंबई हायकोर्टाकडून शिल्पा शेट्टीला दिलासा, फोटोबाबत कोर्टात मोठा युक्तीवाद

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आज

Television Actress : टेलिव्हिजनवर झळकणाऱ्या 'या' अभिनेत्री घेतात बॉलिवूड अभिनेंत्रीपेक्षा जास्त मानधन; कमाई ऐकून व्हाल थक्क

अनेकदा आपल्या असं वाटतं की बॉलिवूड अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकतात त्यामुळे त्यांची कमाई फार जास्त असते.

अभिनेत्री दिपिका कक्कड भावूक, आरोग्याविषयी व्यक्त केली चिंता

टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कड हिला २०२५ मध्ये आपल्याला कॅन्सर असल्याचे समजले. नुकताच यासंबधित

Salman khan : बॉलीवूडच्या भाईजाननं अचानक बदललं आपल्या आगामी चित्रपटाचं नाव; सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत दिला 'हा' सामाजिक संदेश

बॉलीवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमानने आपल्या आगामी चित्रपटाचं नाव बदलण्याची घोषणा केली आहे. नुकताच एक सोशल

धुरंधर द रिंवेज नंतर 'धुरंधर ३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार ?

रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. धुरंधर रिलीज झाल्यानंतर