Nilkamal Boat Accident : मुंबई फिरण्यासाठी आलेल्या आहेर कुटुंबाची ती सफर शेवटची ठरली

तीन वर्षाच्या बाळासह अख्ख कुटुंब समुद्रात बुडालं


मुंबई : मुंबई ही सगळ्यांना भुरळ घालणारी नगरी आहे. काहीजण कामानिमित्त तर काहीजण फिरण्यासाठी अनेकदा कित्येक किलोमीटर लांबून मुंबईत येतात. मुंबईतल्या समुद्र सफारीच अख्ख्या जगाला वेड आहे. मात्र काल (दि.१८/१२/२०२४ ) सायंकाळच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेल्या नीलकमल बोटीचा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात अनेक प्रवाशांचे प्राण गेले आहेत. या मृत्यू पावलेल्या प्रवाशांपैकी पिपंळगावातील आहेर कुटुंबाचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला.



नाशिक जिल्ह्यातील पिपंळगाव बसवंत येथील नाना आहेर हे आपल्या कुटुंबियांसह मुंबईत दम्याच्या उपचारासाठी आले होते. दरम्यान त्यांनी पत्नी व मुलासह गेटवे ऑफ इंडिया येथे समुद्र सफारीचा आनंद घेण्याचे ठरवले होते. मात्र हि सफर त्यांच्या आयुष्यातली शेवटची सफर ठरली. या घटनेने पिंपळ गावात शोककळा पसरली आहे.


Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात