Nilkamal Boat Accident : मुंबई फिरण्यासाठी आलेल्या आहेर कुटुंबाची ती सफर शेवटची ठरली

तीन वर्षाच्या बाळासह अख्ख कुटुंब समुद्रात बुडालं


मुंबई : मुंबई ही सगळ्यांना भुरळ घालणारी नगरी आहे. काहीजण कामानिमित्त तर काहीजण फिरण्यासाठी अनेकदा कित्येक किलोमीटर लांबून मुंबईत येतात. मुंबईतल्या समुद्र सफारीच अख्ख्या जगाला वेड आहे. मात्र काल (दि.१८/१२/२०२४ ) सायंकाळच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेल्या नीलकमल बोटीचा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात अनेक प्रवाशांचे प्राण गेले आहेत. या मृत्यू पावलेल्या प्रवाशांपैकी पिपंळगावातील आहेर कुटुंबाचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला.



नाशिक जिल्ह्यातील पिपंळगाव बसवंत येथील नाना आहेर हे आपल्या कुटुंबियांसह मुंबईत दम्याच्या उपचारासाठी आले होते. दरम्यान त्यांनी पत्नी व मुलासह गेटवे ऑफ इंडिया येथे समुद्र सफारीचा आनंद घेण्याचे ठरवले होते. मात्र हि सफर त्यांच्या आयुष्यातली शेवटची सफर ठरली. या घटनेने पिंपळ गावात शोककळा पसरली आहे.


Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाची तिसऱ्या धावपट्टीकडे वाटचाल

सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन

प्रचार सभेसाठी शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार? एकाच तारखेसाठी सत्ताधारी आणि विरोधक आग्रही

मुंबई: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आणि मुंबई पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांची रणनीती सुरू

मुंबईच्या महापौर आरक्षणाची पाटी नव्याने?

चक्राकार पध्दतीने नव्हे तर नव्याने आरक्षण सोडली जाण्याची शक्यता मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या आगामी

दहिसरमधून उबाठाला व्हाईट वॉश करण्याची महायुतीला संधी

मुंबई (सचिन धानजी): दहिसर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक १मध्ये म्हात्रे आणि घोसाळकर यांच्याशिवाय कुणीच

आचारसंहिता लागू, विद्रुप झालेल्या मुंबईने घेतला मोकळा श्वास; तब्बल २ हजार १०३ जाहिरात फलक हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी): राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची

सुभाष सिंग ठाकूरला २२ डिसेंबरपर्यंत कोठडी

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक गँगस्टार सुभाष सिंग ठाकूरला मीरा-भाईंदर, वसई-विरार मध्यवर्ती