Get Way Accident : गेटवे दुर्घटनेप्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी दिला मदतीचा हात

  81

मुंबई : मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळ नीलकमल बोटीच्या अपघातात मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.तर केंद्रातून २ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींचा खर्च सरकारच करणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.



काल ( दि. १८/१२/२०२४ ) सायंकाळच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली नीलकमल बोट समुद्रात उलटली. ही बोट गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाच्या दिशेने जात होती. दरम्यान नौदलाच्या स्पीड बोटचा ताबा सुटल्याने स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली आणि प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली. या घटनेत बोटीतील सर्व प्रवासी बुडाले.माहिती मिळताच मदत पथक दुसऱ्या बोटीतून घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. बोटीतील १०१ प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नौदलाच्या बोटीच्या चालकाला कुलाबा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.