Get Way Accident : गेटवे दुर्घटनेप्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी दिला मदतीचा हात

मुंबई : मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळ नीलकमल बोटीच्या अपघातात मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.तर केंद्रातून २ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींचा खर्च सरकारच करणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.



काल ( दि. १८/१२/२०२४ ) सायंकाळच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली नीलकमल बोट समुद्रात उलटली. ही बोट गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाच्या दिशेने जात होती. दरम्यान नौदलाच्या स्पीड बोटचा ताबा सुटल्याने स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली आणि प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली. या घटनेत बोटीतील सर्व प्रवासी बुडाले.माहिती मिळताच मदत पथक दुसऱ्या बोटीतून घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. बोटीतील १०१ प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नौदलाच्या बोटीच्या चालकाला कुलाबा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

Shatrughan Sinha: खामोश शब्द वापराल तर..., मुंबई उच्च न्यायालयाने घातली बंदी

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाकडून दिग्गज अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महावीर नगर ,पोयसर जिमखाना परिसर अतिक्रमण मुक्त

वाढीव बांधकामे आणि अनधिकृत स्टॉल्स जमीनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बोरीवली आणि कांदिवली येथील अनधिकृत

महापौर थेट धडकल्या राजावाडी रुग्णालयात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाची मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांनी शनिवारी २१

सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी मुंबईकरांना बनवणार फिट

'फिट मुंबई' पुढाकार अंतर्गत वांद्रे येथे 'फिट सॅटर्डे' मोहीम संपन्न मुंबई (विशेष प्रतिनिधी) : व्यायाम न

‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पर्यावरणविषयक मोहिमेची कृषी क्षेत्राशी सांगड घालावी, राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन मुंबई : पर्यावरण

Nashik Mumbai : खड्ड्यांचं टेन्शन खल्लास! फक्त १२० मिनिटांत गाठाल मुंबई; नाशिक ते मुंबई प्रवासासाठी सरकारचा 'सुपर प्लॅन' काय आहे?

नाशिक : नाशिककरांसाठी विकासाची एक नवी पहाट उजाडली असून, मुंबई आणि नाशिकमधील प्रवासाचा वेळ आता निम्म्यावर येणार