Yashwardhan Ahuja : गोविंदाचा मुलगा यशवर्धन लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई : सुपरस्टार गोविंदाला ओळखत नाही असा एकही सिनेरसिक आढळणार नाही. कॉमेडी सिनेमांमधून गोविंदाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आजही गोविंदा बॉलिवूडमध्ये चर्चेत असतो. पण आता गोविंदाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी.अभिनेता गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजाही बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. २०२५ मध्ये गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा सिल्वर स्क्रीनवर दिसणार आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून यशवर्धन आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.



मीडिया रिपोर्टनुसार राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक साई राजेश यांच्या आगामी रोमँटिक सिनेमात गोविंदाचा लेक यशवर्धन काम करणार आहे. यशववर्धनबरोबर कोणती अभिनेत्री काम करणार हे अजून निश्चित झालं नाहीये. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार अजून सिनेमाचे दिग्दर्शक नवोदित अभिनेत्रींचा शोध घेत आहेत. एक फ्रेश जोडी या सिनेमाच्या माध्यमातून मेकर्सना प्रेक्षकांसमोर आणायची आहे असं सूत्रांनी सांगितलं. २०२५ मध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. सध्या सिनेमासाठी ऑडिशन सुरु असून यशवर्धनसोबत कोणती हिरोईन झळकणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.





पदार्पण करण्यापूर्वी यशवर्धनने निर्मितीक्षेत्रात बराच काळ काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचे डान्स स्किल्स बघून अनेकजण प्रभावित झाले होते.

Comments
Add Comment

दिवाळीच्या आधी परिणितीने दिली गुड न्यूज , परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा झाले आईबाबा...

चड्डा घराण्यात चिमुकल्याचा आगमन झालं आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्डाने दिली गुड न्युज. परिणीती आणि राघव यांनी

माझं कधी काय होईल मला माहित नाही... नाव ठेवणाऱ्यांना स्पष्टच बोलल्या उषा नाडकर्णी

मुंबई : मराठी तसेच हिंदी सिनेइंडस्ट्री मधल्या उषा नाडकर्णी बरेचदा त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात.

अभिनेत्री काजोलचे कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांना दुखावणारे वक्तव्य, उफाळला नवा नाद

मुंबई : सध्या बॉलीवूडच्या अभिनेत्री त्यांच्या कामाच्या वेळेबद्दल काही ना काही वक्तव्य करत आहेत. सर्वात आधी

२०२६ ची होळी सनी देओलसाठी ठरणार का महत्त्वाची ? आगामी चित्रपटाची तारीख जाहीर

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सनी देओल त्याच्या नवीन चित्रपटामधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबत त्याने

भाईजानच्या सुरक्षेत वाढ, शूटींग दरम्यान फोन जवळ ठेवणेही बंधनकारक

मुंबई: सलमान खान नेहमीच त्याला येणाऱ्या धमक्यांमुळे चर्चेत असतो. सलमानला सतत येणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या

'ठरलं तर मग' मालिकेत आजीची भूमिका साकारणार रोहिणी हट्टंगडी

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.