विधान परिषद सभापतीपदासाठी राम शिंदेंना उमेदवारी, आज दाखल करणार अर्ज

  106

शिंदे आज दाखल करणार उमेदवारी अर्ज


नागपूर: महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीतर्फे भाजपच्या राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलीय. शिंदे बुधवारी १८ डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते. आज, मंगळवारी या पदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारच्या सत्रात विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत गिरीश महाजन होते. यात विधान परिषद सभापतीपदाबाबत चर्चा करण्यात आली. भाजपकडेच हे पद जाणार असल्याने पक्ष कोणाला यासाठी संधी देणार याबाबत उत्सुकता होती.


राम शिंदे आणि दरेकर या दोन नेत्यांच्या नावाची चर्चा होती. त्यानंतर संध्याकाळी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून ते बुधवारी अर्ज दाखल करणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते कर्जत विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते. मात्र निवडणुकीच्या आधी त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली होती. परिषदेत महायुतीचे बहुमत असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जातो. दरम्यान शिंदे यांनी आपल्या उमेदवारीबद्दल ट्विटरवर संदेश जारी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या