गेटवे ऑफ इंडियाजवळील बोट दुर्घटनेत मृतांचा आकडा १३वर

मुंबई: मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने जाणारी प्रवासी बोट उलटल्याने बुधवारी मोठी दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने टक्कर दिली. यामुळे ही दुर्घटना घडली. याचा व्हिडिओही समोर आला आहे. यात नौदलाच्या ३ जवानांसह १३ जणांचा मृत्यू झाला.



एलिफंटाच्या दिशेने जात होती बोट


ही घटना बुधवारी संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. एलिफंटाच्या दिशेने ही नीलकमल बोट जात होती. यावेळी उरण, करंजाजवळ नौदलाच्या स्पीड बोटची धडक बसल्याने ही बोट पलटली. या बोटीमध्ये साधारण ११०हून अधिक जण होते. मिळालेल्या माहितीनुसार अधिकाधिक लोकांना वाचवण्यात आले आहे तर १३ जणांचा यात मृत्यू झाला. तर पाच जण गंभीररित्या जखमी झालेत.





यासंदर्भातील माहितीनुसार, उरण, कारंजाजवळ 'नीलकमल' ही फेरीबोट उलटली. नौदल, तटरक्षक दल, यलोगेट पोलिस स्टेशन आणि स्थानिक मासेमारी नौकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बोटीमधील १०१ प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तर या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झालाय. गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाकडे जाण्यासाठी भाऊच्या धक्क्यावरुन नीलकमल नावाची बोट निघाली होती. यावेळी समुद्रातून दुसऱ्या बाजूने एक स्पीडबोट जात होती. यावेळी त्या स्पीडबोटचे नियंत्रण सुटल्याने ती बोट सरळ फेरीच्या बोटीवर येऊन जोरात आदळली. त्यामुळे फेरीची बोट बुडाली. या घटनेचा व्हिडीओ सद्धा व्हायरल होत आहे.

या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुक्रम विधानसभा आणि विधान परिषदेत माहिती दिली

मुख्यमंत्र्‍यांकडून मदतीची घोषणा


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताप्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्‍यांनी या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियासाठी प्रत्येकी पाच लाख रूपये मदतीची घोषणा केली आहे.

Comments
Add Comment

लाडक्या बहिणींना धक्का; केवायसी न केलेल्या आणि नियमांचे उल्लंघन केलेल्या महिला योजनेतून बाद

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी महायुती सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'

Santosh Nalawade : वापरा आणि फेकून द्या...मनसेच्या शिवडी अध्यक्षांनी का दिला राजीनामा? ५ मोठी कारणं आली समोर

मनसेच्या वटवृक्षाला नेत्यांनीच टोचलं विषारी इंजेक्शन? मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात

खुशखबर! लोकल आणि मेल एक्सप्रेससाठी मिळणार स्वतंत्र मार्ग; मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून आदेश जारी...

मुंबई : मुंबईतील रेल्वेचे जाळे हे वेगानं वाढत चाललं आहेत. त्यामुळे अनेक शहरे मुंबईला जोडली जात आहे. मुंबई

Devendra Fadnavis On Raj Thackeray : राज ठाकरे इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; फडणवीसांनी मांडलं पराभवाचं गणित, ठाकरेंच्या 'वारशा'वरही ओढले ताशेरे

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क त्यांच्या राजकीय

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण