Mumbai Pollution : प्रदूषणाच्या विळख्यात अडकली मुंबईची हवा

मुंबई : मुंबईच्या किमान तापमानात घट झाल्यानंतर आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईची हवा सोमवारी ‘मध्यम’ श्रेणीत असली, तरी शिवाजीनगर – गोवंडी आणि मालाड येथील हवेची गुणवत्ता ‘वाईट’, नेव्ही नगर – कुलाबा येथील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदली गेली. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकर चिंतित झाले आहेत. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक सोमवारी १४९ इतका होता. नेव्ही नगर, कुलाबा येथे ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ३१५ इतका होता, तर गोवंडी शिवाजीनगर आणि मालाड येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली.



तेथील हवा निर्देशांक अनुक्रमे २१८, २१३ इतका होता. या केंद्रांवर ‘पीएम २.५’ या प्रदूषकाचे प्रमाण वाढल्याची नोंद झाली. अशा हवेत हृदय किंवा फुप्फुसांचा आजार असलेल्यांनी, गर्भवती महिला आणि लहान मुलांनी जास्त काळ राहू नये. तसेच शक्य असल्यास मुखपट्टीचा वापर करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवा प्रदूषणात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


हवेची गुणवत्ता घसरण्यासाठी केवळ औद्योगिक स्त्रोतांद्वारे होणारे प्रदूषण कारणीभूत नसून मुंबईतील बांधकामांचाही परिणाम यावर होत आहे. अधून-मधून मुंबईतील दृश्यमानताही बाधित होत असते. त्यामुळे हवेमध्ये अति सूक्ष्म प्रदूषकांसोबतच तुलनेने मोठ्या आकाराचीही प्रदूषके असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस