Mumbai Pollution : प्रदूषणाच्या विळख्यात अडकली मुंबईची हवा

  71

मुंबई : मुंबईच्या किमान तापमानात घट झाल्यानंतर आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईची हवा सोमवारी ‘मध्यम’ श्रेणीत असली, तरी शिवाजीनगर – गोवंडी आणि मालाड येथील हवेची गुणवत्ता ‘वाईट’, नेव्ही नगर – कुलाबा येथील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदली गेली. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकर चिंतित झाले आहेत. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक सोमवारी १४९ इतका होता. नेव्ही नगर, कुलाबा येथे ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ३१५ इतका होता, तर गोवंडी शिवाजीनगर आणि मालाड येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली.



तेथील हवा निर्देशांक अनुक्रमे २१८, २१३ इतका होता. या केंद्रांवर ‘पीएम २.५’ या प्रदूषकाचे प्रमाण वाढल्याची नोंद झाली. अशा हवेत हृदय किंवा फुप्फुसांचा आजार असलेल्यांनी, गर्भवती महिला आणि लहान मुलांनी जास्त काळ राहू नये. तसेच शक्य असल्यास मुखपट्टीचा वापर करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवा प्रदूषणात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


हवेची गुणवत्ता घसरण्यासाठी केवळ औद्योगिक स्त्रोतांद्वारे होणारे प्रदूषण कारणीभूत नसून मुंबईतील बांधकामांचाही परिणाम यावर होत आहे. अधून-मधून मुंबईतील दृश्यमानताही बाधित होत असते. त्यामुळे हवेमध्ये अति सूक्ष्म प्रदूषकांसोबतच तुलनेने मोठ्या आकाराचीही प्रदूषके असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.