Ind vs Aus : बुमराह-आकाशदीपच्या जोडीने रचला इतिहास, २१व्या शतकात केला भागीदारीचा रेकॉर्ड

मुंबई: गाबा कसोटीत जसप्रीत बुमराह आणि आकाशदीपच्या जोडीने बॅटिंगमध्ये ती कमाल केलीये जी २१व्या शतकात याआधी कोणालाच करता आली नाही. बुमराह आणि काश यांनी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्तं १०व्या विकेटसाठी नाबाद ३९ धावांची भागीदारी केली. याआधी गाबा कसोटीत भारतासाठी १०व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी १९९१मध्ये झाली होती. ही भागीदारी मनोज प्रभाकर आणि जवागल श्रीनाथ यांनी केली होती.


बुमराह आणि आकाशदीप यांच्याआधी गाबा कसोटीत भारतासाठी १०व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी ३३ धावांची होती. ही मनोज प्रभाकर आणि जवागल श्रीनाथ यांची होती. आता बुमराह आणि आकाशदीप यांनी नाबाद ३९ धावांची भागीदारी केली आहे. बुमराह आणि आकाश चौथ्या दिवशी खेळ समाप्त होताना नाबाद परतले आहेत.



गाबा कसोटीत भारताकडून १०व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी


जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप - नाबाद ३९ धावा(२०२४)


मनोज प्रभाकर आणि जवागल श्रीनाथ - ३३ धावा (१९९१)


मोटगनहल्ली जयसिम्हा आणि उमेश कुलकर्णी - २२ धावा(१९६८)


वेंकटपती राजू आणि जवागल श्रीनाथ - १४ धावा (१९९१)


इशांत शर्मा आणि उमेश यादव - १४ धावा(२०१४)



फॉलोऑनने वाचला भारत


एकीकडे असे वाटत होते की भारताला फॉलोऑन मिळेल. मात्र जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांच्या शानदार भागीदारीमुळे संघाला फॉलोऑनपासून वाचता आले. दोघांनी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १०व्या विकेटसाठी नाबाद ३९ धावांची भागीदारी केली.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे