Pune E-Bus : पुणेकरांचा प्रवास होणार आरामदायी! एसटी विभागात दाखल होणार नव्या १३४ ई-बस

  78

पुणे : पुणे एसटी विभागात नव्याने १३४ ई-बस (Pune E-Bus) दाखल होणार असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. एसटीच्या ताफ्यातून लालपरी कमी झाल्याने गाड्यांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे नव्या इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आली असून, त्या पुढील दोन महिन्यांत येतील, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.



एसटी महामंडळाकडून (MSRTC) डिझेलच्या गाडीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. सध्या विविध सवलतीमुळे एसटीचे प्रवासी वाढले आहेत. त्यामुळे एसटीच्या दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ झाली आहे, तसेच वातानूकुलित इलेक्ट्रिक बस असल्यामुळे प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.


पुण्यातून सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या मार्गांवर इलेक्ट्रिक बस धावत आहेत. पुढील काळात या मार्गासह अन्य मार्गांवरही इलेक्ट्रिक बसची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या इलेक्ट्रिक बसचा फायदा होणार असून, बसची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.


कोल्हापूर, नाशिक, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या मार्गांवरील इलेक्ट्रिक बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच १३४ इलेक्ट्रिक बस पुणे विभागात दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना तात्काळ, आरामदायी आणि वातानूकुलित प्रवास उपलब्ध होणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत