Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या फायनलमध्ये मुंबईची बाजी, मध्य प्रदेशचा पराभव

मुंबई: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेचा(Syed Mushtaq Ali Trophy) अंतिम सामना रविवारी १५ डिसेंबरला खेळवण्यात आला. हा खिताबी सामना मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात रंगला होता. यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने जबरदस्त कामगिरी करताना फायनल सामना आणि खिताब दोन्ही आपल्या नावे केले.


सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करताना रजत पाटीदारच्या नेतृत्वातील मध्य प्रदेश संघाने सर्व बाद १७५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाने १७.५ षटकांतच ५ विकेट गमावताना १८० धावा करत खिताबावर शिक्कामोर्तब केले.



पाटीदारची कर्णधाराला साजेशी खेळी


सामन्यात पहिल्यांदा खेळी करताना मध्य प्रदेशच्या संघाने ८ बाद १७४ धावा केल्या होत्या. संघाची सुरूवात खराब झाली होती. संघाने ६ वर २ विकेट गमावले होते. त्यानंतर ८६ धावांवर अर्धा संघ तंबूत परतला होता. अशा स्थितीत कर्णधार पाटीदारने मोर्चा सांभाळला आणि ४० बॉलमध्ये ८१ धावांची नाबाद खेळी केली.


पाटीदारने आपल्या खेळीदरम्यान ६ षटकार आणि तितकेच चौकार ठोकले. याशिवाय कोणत्याही खेळाडूला २५ धावांचा आकडाही पार करता आला नाही. तर मुंबईकडून शार्दूल ठाकूर आणि रोयस्टन डायसने प्रत्येकी २ विकेट मिळवले.

Comments
Add Comment

कांगारूंनी भारतीय महिलांचा उडवला धुव्वा!

होबार्ट : ऑस्ट्रेलियन महिला संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर भारतीय महिला संघाला पूर्णपणे

नागपूरच्या गनपावडर कारखान्यात स्फोट, १७ ठार

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून होलिकोत्सवाच्या आदल्या दिवशी एक दुःखद बातमी आली आहे.

अमेरिका - इराण युद्धाचा वर्ल्डकपवर परिणाम, आयसीसीची यंत्रणा लागली कामाला

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात संयुक्तपणे हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांना इराणकडून

T20 World Cup 2026 Ind vs WI : दोन्ही संघासाठी करो वा मरोची लढत; जाणून घ्या Playing XI मध्ये कोणाकोणाची समावेश

टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून ग्रुप ए मधील फक्त दोन सामने बाकी आहेत. यामध्ये एक

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून