Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या फायनलमध्ये मुंबईची बाजी, मध्य प्रदेशचा पराभव

  55

मुंबई: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेचा(Syed Mushtaq Ali Trophy) अंतिम सामना रविवारी १५ डिसेंबरला खेळवण्यात आला. हा खिताबी सामना मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात रंगला होता. यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने जबरदस्त कामगिरी करताना फायनल सामना आणि खिताब दोन्ही आपल्या नावे केले.


सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करताना रजत पाटीदारच्या नेतृत्वातील मध्य प्रदेश संघाने सर्व बाद १७५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाने १७.५ षटकांतच ५ विकेट गमावताना १८० धावा करत खिताबावर शिक्कामोर्तब केले.



पाटीदारची कर्णधाराला साजेशी खेळी


सामन्यात पहिल्यांदा खेळी करताना मध्य प्रदेशच्या संघाने ८ बाद १७४ धावा केल्या होत्या. संघाची सुरूवात खराब झाली होती. संघाने ६ वर २ विकेट गमावले होते. त्यानंतर ८६ धावांवर अर्धा संघ तंबूत परतला होता. अशा स्थितीत कर्णधार पाटीदारने मोर्चा सांभाळला आणि ४० बॉलमध्ये ८१ धावांची नाबाद खेळी केली.


पाटीदारने आपल्या खेळीदरम्यान ६ षटकार आणि तितकेच चौकार ठोकले. याशिवाय कोणत्याही खेळाडूला २५ धावांचा आकडाही पार करता आला नाही. तर मुंबईकडून शार्दूल ठाकूर आणि रोयस्टन डायसने प्रत्येकी २ विकेट मिळवले.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी