Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या फायनलमध्ये मुंबईची बाजी, मध्य प्रदेशचा पराभव

  75

मुंबई: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेचा(Syed Mushtaq Ali Trophy) अंतिम सामना रविवारी १५ डिसेंबरला खेळवण्यात आला. हा खिताबी सामना मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात रंगला होता. यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने जबरदस्त कामगिरी करताना फायनल सामना आणि खिताब दोन्ही आपल्या नावे केले.


सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करताना रजत पाटीदारच्या नेतृत्वातील मध्य प्रदेश संघाने सर्व बाद १७५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाने १७.५ षटकांतच ५ विकेट गमावताना १८० धावा करत खिताबावर शिक्कामोर्तब केले.



पाटीदारची कर्णधाराला साजेशी खेळी


सामन्यात पहिल्यांदा खेळी करताना मध्य प्रदेशच्या संघाने ८ बाद १७४ धावा केल्या होत्या. संघाची सुरूवात खराब झाली होती. संघाने ६ वर २ विकेट गमावले होते. त्यानंतर ८६ धावांवर अर्धा संघ तंबूत परतला होता. अशा स्थितीत कर्णधार पाटीदारने मोर्चा सांभाळला आणि ४० बॉलमध्ये ८१ धावांची नाबाद खेळी केली.


पाटीदारने आपल्या खेळीदरम्यान ६ षटकार आणि तितकेच चौकार ठोकले. याशिवाय कोणत्याही खेळाडूला २५ धावांचा आकडाही पार करता आला नाही. तर मुंबईकडून शार्दूल ठाकूर आणि रोयस्टन डायसने प्रत्येकी २ विकेट मिळवले.

Comments
Add Comment

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता