Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या फायनलमध्ये मुंबईची बाजी, मध्य प्रदेशचा पराभव

Share

मुंबई: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेचा(Syed Mushtaq Ali Trophy) अंतिम सामना रविवारी १५ डिसेंबरला खेळवण्यात आला. हा खिताबी सामना मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात रंगला होता. यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने जबरदस्त कामगिरी करताना फायनल सामना आणि खिताब दोन्ही आपल्या नावे केले.

सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करताना रजत पाटीदारच्या नेतृत्वातील मध्य प्रदेश संघाने सर्व बाद १७५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाने १७.५ षटकांतच ५ विकेट गमावताना १८० धावा करत खिताबावर शिक्कामोर्तब केले.

पाटीदारची कर्णधाराला साजेशी खेळी

सामन्यात पहिल्यांदा खेळी करताना मध्य प्रदेशच्या संघाने ८ बाद १७४ धावा केल्या होत्या. संघाची सुरूवात खराब झाली होती. संघाने ६ वर २ विकेट गमावले होते. त्यानंतर ८६ धावांवर अर्धा संघ तंबूत परतला होता. अशा स्थितीत कर्णधार पाटीदारने मोर्चा सांभाळला आणि ४० बॉलमध्ये ८१ धावांची नाबाद खेळी केली.

पाटीदारने आपल्या खेळीदरम्यान ६ षटकार आणि तितकेच चौकार ठोकले. याशिवाय कोणत्याही खेळाडूला २५ धावांचा आकडाही पार करता आला नाही. तर मुंबईकडून शार्दूल ठाकूर आणि रोयस्टन डायसने प्रत्येकी २ विकेट मिळवले.

Recent Posts

Afganisthan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये ५.९ तीव्रतेचा भूकंप!

जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…

2 minutes ago

Mithun Chakraborty : “पश्चिम बंगाल हातून निसटोय”- मिथुन चक्रवर्ती

कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…

11 minutes ago

Nashik News : नाशिककरांची उन्हाच्या चटक्यांमुळे सिग्नलवर थांबण्याची दमछाक!

नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…

2 hours ago

Amruta Khanvilkar: आलेच मी…’, या सईच्या गाण्यावर अमृता खानविलकर थिरकली!

नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…

2 hours ago

Beed : बीडचा पाणी प्रश्न सोडवणार, गहिनीनाथ गडाला तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…

2 hours ago

Cold Water Benefits : थंड पाण्याने चेहरा धुतल्यास होतील ‘हे’ फायदे!

निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…

3 hours ago