‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक सोमवारी लोकसभेत

नवी दिल्ली : भारत देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात, निवडणूक प्रक्रिया अधिक प्रभावी, किफायतशीर आणि वेळेची बचत करण्यासाठी ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक प्रस्तावित करण्यात आले आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल सोमवारी १६ डिसेंबर रोजी हे विधेयक लोकसभेत मांडणार आहेत.

लोकसभेत हे विधेयक मांडल्यानंतर सविस्तर चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवले जाईल. ‘एक देश, एक निवडणूक’ यासाठी 2 सुधारणा विधेयके आणली जातील. यापैकी एक विधेयक लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्यासाठी तर दुसरे विधेयक दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि पाँडीचेरी विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी असेल.

केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच या विधेयकाला मंजुरी दिली असून २०३४ नंतर देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी राज्यघटनेत बदल केले जातील, ज्यामध्ये कलम ८३, १७२ आणि ३२७ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय केंद्रशासित प्रदेश आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना कायद्यातही बदल करण्यात येणार आहेत.

‘एक देश, एक निवडणूक’ या प्रस्तावावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाष्य करत भाजपला लक्ष्य केले. हा प्रस्ताव म्हणजे भाजपचा ‘निवडणूक जिंकण्याचा जुगाड’ आहे. खराब वातावरणाच्या परिस्थितीमुळे किंवा सणासुदीमुळे निवडणुका पुढे ढकलणारे सरकार एकाच वेळी निवडणुका कशा घेऊ शकते, असा प्रश्नही यादव उपस्थित केला.

Comments
Add Comment

डॉक्टरांनी लाच घेऊन मुलांच्या जीवाशी खेळ केला, पोलिसांचा कोल्ड्रिफ प्रकरणात गंभीर आरोप

छिंदवाडा : खोकल्यावरचे औषध म्हणून कोल्ड्रिफ कफ सिरप प्यायलेल्या मध्य प्रदेशमधील अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला.

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

ला निनामुळे नोव्हेंबरपासून तीव्र थंडीचा अंदाज

राज्यातून मान्सून माघारी परतलाय, पण ऑक्टोबर हीटमुळे सध्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. पहाटे हवेत प्रचंड

कोल्ड्रिफ कफ सिरप कंपनीचा परवाना तामिळनाडू सरकारकडून रद्द

तामिळनाडू सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सचा उत्पादन परवाना पूर्णपणे रद्द करत,

ईपीएफओचा मोठा निर्णय, पीएफ खात्यातून १००% रक्कम काढण्याची परवानगी

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सात कोटींहून अधिक सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओच्या

‘गलिच्छ शौचालयाची तक्रार करा आणि FASTag मध्ये ₹१,००० रिचार्ज मिळवा’

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने देशातील महामार्गांवर स्वच्छता आणि चांगली सुविधा सुनिश्चित