‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक सोमवारी लोकसभेत

नवी दिल्ली : भारत देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात, निवडणूक प्रक्रिया अधिक प्रभावी, किफायतशीर आणि वेळेची बचत करण्यासाठी ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक प्रस्तावित करण्यात आले आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल सोमवारी १६ डिसेंबर रोजी हे विधेयक लोकसभेत मांडणार आहेत.

लोकसभेत हे विधेयक मांडल्यानंतर सविस्तर चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवले जाईल. ‘एक देश, एक निवडणूक’ यासाठी 2 सुधारणा विधेयके आणली जातील. यापैकी एक विधेयक लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्यासाठी तर दुसरे विधेयक दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि पाँडीचेरी विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी असेल.

केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच या विधेयकाला मंजुरी दिली असून २०३४ नंतर देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी राज्यघटनेत बदल केले जातील, ज्यामध्ये कलम ८३, १७२ आणि ३२७ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय केंद्रशासित प्रदेश आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना कायद्यातही बदल करण्यात येणार आहेत.

‘एक देश, एक निवडणूक’ या प्रस्तावावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाष्य करत भाजपला लक्ष्य केले. हा प्रस्ताव म्हणजे भाजपचा ‘निवडणूक जिंकण्याचा जुगाड’ आहे. खराब वातावरणाच्या परिस्थितीमुळे किंवा सणासुदीमुळे निवडणुका पुढे ढकलणारे सरकार एकाच वेळी निवडणुका कशा घेऊ शकते, असा प्रश्नही यादव उपस्थित केला.

Comments
Add Comment

गुजरातमधील आश्रमात बनावट नोटांचा गोरखधंदा उघड

 पोलिसांकडून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त  अहमदाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहमदाबाद  :  नाशिकमधील

छत्तीसगडमधील बेकायदेशीर सामूहिक धर्मांतरास जन्मठेपेची शिक्षा

धर्मांतरविरोधी विधेयक मंजूर बळजबरी आणि प्रलोभनाद्वारे धर्मांतरासाठी कठोर दंडात्मक तरतुदी रायपूर : छत्तीसगड

केंद्र सरकारचा बेटिंग आणि जुगाराच्या अ‍ॅप्सवर स्ट्राईक

नवी दिल्ली : देशातील वाढत्या बेकायदेशीर ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर