School Picnic Busses : आता विद्यार्थ्यांच्या सहलीचा प्रवास होणार राज्य परिवहन बसमधून!

शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांचे आदेश


नाशिक : हिवाळा हा शैक्षणिक सहलींचा हंगाम असल्याने अनेक शाळांकडून शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जात आहे. या शैक्षनिक सहल खासगी बसमधून नेण्यात येतात. मात्र या सहलींबाबात शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत.
नागपूर येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसला अमरावती रोडवर देवरी पेंढरी गावाजवळ अपघात होऊन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.


यावेळी तपासादरम्यान बसचालकाकडे परवाना नसल्याचे आणि शाळेने सहलीसाठी शिक्षण विभागाची अधिकृत परवानगीदेखील घेतली नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता महापालिकेचे शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांनी महापालिका हद्दीतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना परिपत्रक जारी करत, शाळांच्या सहलीसाठी खासगी बसेसचा वापर करण्यास बंदी घातली आहे.



त्याचबरोबर आता केवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा वापर करावा आणि वाहकांची शारीरिक स्थिती योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.



काय आहेत शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश?


१.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसनेच सहल न्यायी.
२.शालेय सहलीसाठी शिक्षण विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी.
३.सहलीत सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतिपत्र घ्यावे.
४.कुठल्याही विद्यार्थ्याला सहलीची सक्ती केली जाऊ नये.
५.सूचनांचे पालन न केल्यास मुख्याध्यापकांवर जबाबदारी निश्चित करणार.

Comments
Add Comment

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,

Empty Stomach Food : सकाळी रिकाम्या पोटी नक्की काय खावं अन् काय टाळावं? 'या' एका चुकीमुळे बिघडू शकतं तुमचं पचनतंत्र!

रिकाम्या पोटी प्रत्येकासाठी एकच पदार्थ योग्य असेल असे नाही. तुमची पचनशक्ती, अॅसिडिटी आणि इतर आरोग्यविषयक

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८