School Picnic Busses : आता विद्यार्थ्यांच्या सहलीचा प्रवास होणार राज्य परिवहन बसमधून!

शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांचे आदेश


नाशिक : हिवाळा हा शैक्षणिक सहलींचा हंगाम असल्याने अनेक शाळांकडून शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जात आहे. या शैक्षनिक सहल खासगी बसमधून नेण्यात येतात. मात्र या सहलींबाबात शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत.
नागपूर येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसला अमरावती रोडवर देवरी पेंढरी गावाजवळ अपघात होऊन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.


यावेळी तपासादरम्यान बसचालकाकडे परवाना नसल्याचे आणि शाळेने सहलीसाठी शिक्षण विभागाची अधिकृत परवानगीदेखील घेतली नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता महापालिकेचे शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांनी महापालिका हद्दीतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना परिपत्रक जारी करत, शाळांच्या सहलीसाठी खासगी बसेसचा वापर करण्यास बंदी घातली आहे.



त्याचबरोबर आता केवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा वापर करावा आणि वाहकांची शारीरिक स्थिती योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.



काय आहेत शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश?


१.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसनेच सहल न्यायी.
२.शालेय सहलीसाठी शिक्षण विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी.
३.सहलीत सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतिपत्र घ्यावे.
४.कुठल्याही विद्यार्थ्याला सहलीची सक्ती केली जाऊ नये.
५.सूचनांचे पालन न केल्यास मुख्याध्यापकांवर जबाबदारी निश्चित करणार.

Comments
Add Comment

Pakistan News : पाकिस्तानात दोन गटांमध्ये भीषण चकमक; १४ जण ठार, टीटीपी कमांडरचाही खात्मा

पाकिस्तान : पाकिस्तानच्या वायव्य भागातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात बुधवारी दोन सशस्त्र गटांमध्ये भीषण चकमक

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक; मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

टेक-महाइम्पॅक्ट परिषदेत पहिल्याच दिवशी १५० कोटींचे करार

मुंबई : राज्याच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देण्यासाठी ‘आयटी’ विभागाच्या वतीने बुधवारी