School Picnic Busses : आता विद्यार्थ्यांच्या सहलीचा प्रवास होणार राज्य परिवहन बसमधून!

  180

शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांचे आदेश


नाशिक : हिवाळा हा शैक्षणिक सहलींचा हंगाम असल्याने अनेक शाळांकडून शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जात आहे. या शैक्षनिक सहल खासगी बसमधून नेण्यात येतात. मात्र या सहलींबाबात शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत.
नागपूर येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसला अमरावती रोडवर देवरी पेंढरी गावाजवळ अपघात होऊन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.


यावेळी तपासादरम्यान बसचालकाकडे परवाना नसल्याचे आणि शाळेने सहलीसाठी शिक्षण विभागाची अधिकृत परवानगीदेखील घेतली नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता महापालिकेचे शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांनी महापालिका हद्दीतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना परिपत्रक जारी करत, शाळांच्या सहलीसाठी खासगी बसेसचा वापर करण्यास बंदी घातली आहे.



त्याचबरोबर आता केवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा वापर करावा आणि वाहकांची शारीरिक स्थिती योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.



काय आहेत शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश?


१.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसनेच सहल न्यायी.
२.शालेय सहलीसाठी शिक्षण विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी.
३.सहलीत सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतिपत्र घ्यावे.
४.कुठल्याही विद्यार्थ्याला सहलीची सक्ती केली जाऊ नये.
५.सूचनांचे पालन न केल्यास मुख्याध्यापकांवर जबाबदारी निश्चित करणार.

Comments
Add Comment

येथे झाली ठाकरे बंधूंची युती; ठाकरे गट १९ तर मनसे २ जागांवर लढणार!

बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलची एन्ट्री मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून

Mahavatar Narsimha Box Office Collection: 'महावतार नरसिंह' ने भारतातील दुसरा सर्वात मोठा विक्रम मोडला, लवकरच प्रथम स्थानावर येण्याची शक्यता

Mahavatar Narsimha Box Office Collection: महावतार नरसिंह बॉक्स ऑफिस कलेक्शन: 'महावतार नरसिंह' या एनिमेटेड फिल्मने भारतातील दुसरा सर्वात

रत्नागिरीत निवृत्त शिक्षिकेचा 'या कारणासाठी' केला खून

रत्नागिरी : धामणवणे (ता. चिपळूण) येथे झालेल्या निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी (वय ६८) यांचा खून झाला. या प्रकरणाचा

सणासुदीला ठाण्यात वाहतूक कोंडीचा महाकाय विळखा!

ठाणे : रक्षाबंधन सणादरम्यान शनिवारी हजारो प्रवाशांना प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. प्रचंड वाहतूक

जमीन विक्रीस हरकत घेणा-या आईचा गळा घोटला; नंतर केली आत्महत्या

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून

तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली! रक्षाबंधनाच्या दिवशीच केली पत्नीसह दोन मुलींची निर्घृण हत्या

नवी दिल्ली : दिल्लीतील करावल नगर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रदीप नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नी