School Picnic Busses : आता विद्यार्थ्यांच्या सहलीचा प्रवास होणार राज्य परिवहन बसमधून!

शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांचे आदेश


नाशिक : हिवाळा हा शैक्षणिक सहलींचा हंगाम असल्याने अनेक शाळांकडून शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जात आहे. या शैक्षनिक सहल खासगी बसमधून नेण्यात येतात. मात्र या सहलींबाबात शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत.
नागपूर येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसला अमरावती रोडवर देवरी पेंढरी गावाजवळ अपघात होऊन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.


यावेळी तपासादरम्यान बसचालकाकडे परवाना नसल्याचे आणि शाळेने सहलीसाठी शिक्षण विभागाची अधिकृत परवानगीदेखील घेतली नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता महापालिकेचे शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांनी महापालिका हद्दीतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना परिपत्रक जारी करत, शाळांच्या सहलीसाठी खासगी बसेसचा वापर करण्यास बंदी घातली आहे.



त्याचबरोबर आता केवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा वापर करावा आणि वाहकांची शारीरिक स्थिती योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.



काय आहेत शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश?


१.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसनेच सहल न्यायी.
२.शालेय सहलीसाठी शिक्षण विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी.
३.सहलीत सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतिपत्र घ्यावे.
४.कुठल्याही विद्यार्थ्याला सहलीची सक्ती केली जाऊ नये.
५.सूचनांचे पालन न केल्यास मुख्याध्यापकांवर जबाबदारी निश्चित करणार.

Comments
Add Comment

पाकिस्तानातही धुरंधरची क्रेझ,बंदी असूनही टीव्हीवर झळकतोय धुरंधर २

जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रणवीर सिंहचा 'धुरंधर २' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

लवकरच 'तुंबाडची मंजुळा' प्रेक्षकांच्या भेटीला येणार

- सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलीज गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झी स्टुडिओजनं आपल्या आगामी सिनेमा 'तुंबाडची

विक्रम गोखले यांच्या शेवटच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

- निधनाच्या ३ महिन्यांनंतर विक्रम गोखले यांच्या अंतिम सिनेमाचे पोस्टर रिलीज मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले मुंबईतील गिरगावसह

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

भारती सिंहच्या काजूला पाहिलं का?

- तीन महिन्यानंतर भारतीनं दाखवला दुसऱ्या मुलाचा चेहरा प्रसिद्ध कॉमेडी क्विन भारती सिंह हिने नुकताच तिच्या