Mandhardevi Kalubai Yatra : तारीख ठरली! यंदाची मांढरदेवी काळुबाईची यात्रा १२ जानेवारीला भरणार

सातारा : राज्यभरातील भाविकांना नवसाला पावणारी देवी अशी मोठी ख्याती असलेल्या श्री काळुबाई देवीची यात्रा (Mandhardevi Kalubai Yatra) दरवर्षी पौष महिन्यात पौष पौर्णिमेला भरते. लाखो भाविक या यात्रेची आतुरतेने वाट पाहत असतात. महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवी येथील श्री काळुबाई देवीच्या यात्रेची तारीख समोर आली आहे.



यावर्षी काळुबाईची यात्रा येत्या १२ जानेवारी रोजी देवीचा जागर चालू होऊन मुख्य दिवस १३ जानेवारीला असणार आहे. ही यात्रा १२ ते १४ जानेवारी या कालावधीत भरणार आहे. अशातच यात्रा अवघ्या महिनाभरावर येवून ठेपली असून यात्रा उत्सवाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे, अशी माहिती मांढरदेव देवस्थान विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली आहे.



यात्रेदरम्यान वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता 


देवीच्या यात्रेसाठी कापूरहोळ- भोर- आंबाडे मार्गावरून मोठ्या प्रमाणावर आंबाडखिंड घाटमार्गे भाविकांची गर्दी होत असते. मात्र यंदा रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता वाहन चालकांकडून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या यात्रेला मागील वर्षाच्या तुलनेत भाविकांची गर्दी कमी होण्याचे चित्र आहे. संबंधित विभागाने मांढरदेवी यात्रा काळासाठी सुरू असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करून दिले तरच भाविक भक्तांना आंबाडखिंड घाटमार्गे काळूबाई देवीला जाणे सोयस्कर ठरणार आहे. अन्यथा भाविकांना शेकडो किलोमीटर लांब पल्यावरून वाईमार्गे देवीच्या यात्रेला आर्थिक नुकसान सहन करून जावे लागणार आहे.

सध्या भोर -आंबाडे-आंबाडखिंड घाट रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू ३१ डिसेंबर पर्यंत हे काम सुरू राहणार आहे.एक महिन्यावर येऊ घातलेल्या मांढरदेवी येथील श्री काळुबाई देवीच्या यात्रेसाठी ३१ डिसेंबर पासून वाहतुकीस रस्ता पूर्णपणे खुला करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग भोर उपविभागीय अभियंता राजेसाहेब आगळे यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून