Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! दोन दिवस होणार टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा

ठाणे : ठाणे महानगरपालिकेला (Thane Municipality) मे. स्टेम प्राधिकरणाकडून दुरुस्ती आवश्यक कामे करण्यासाठी पाणीपुरवठ्याचा २४ (Thane Water Supply) तासांसाठी शटडाऊन घेतला आहे. यादरम्यान आज सकाळी ९ वाजता ते उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत असा २४ तासांचा शटडाऊन घेत ठाणे महानगरपालिकेने पाणीपुरवठा योजनेचे नियोजन केले आहे. यावेळी ठाणे शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना पाणी जपून वापरा, असे आवाहन करण्यात आले आहे.



घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डॉगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा, इत्यादी ठिकाणाचा पाणीपुरवठा आज सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील व समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत. उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्राचा काही भाग आज रात्री ९ ते शनिवार रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. अशा रितीने पाणीपुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, शटडाऊन मुळे पाणीपुरवठा पुर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.