Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! दोन दिवस होणार टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा

ठाणे : ठाणे महानगरपालिकेला (Thane Municipality) मे. स्टेम प्राधिकरणाकडून दुरुस्ती आवश्यक कामे करण्यासाठी पाणीपुरवठ्याचा २४ (Thane Water Supply) तासांसाठी शटडाऊन घेतला आहे. यादरम्यान आज सकाळी ९ वाजता ते उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत असा २४ तासांचा शटडाऊन घेत ठाणे महानगरपालिकेने पाणीपुरवठा योजनेचे नियोजन केले आहे. यावेळी ठाणे शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना पाणी जपून वापरा, असे आवाहन करण्यात आले आहे.



घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डॉगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा, इत्यादी ठिकाणाचा पाणीपुरवठा आज सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील व समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत. उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्राचा काही भाग आज रात्री ९ ते शनिवार रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. अशा रितीने पाणीपुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, शटडाऊन मुळे पाणीपुरवठा पुर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार

मुंबईतील गोरेगावात ४५ मजली इमारतीला भीषण आग

मुंबई: मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या ४५ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या नवव्या मजल्यावर

पहिल्या महापालिका सभेत मुख्यमंत्र्यांच्या समक्ष भाजप नगरसेवकांचे घडले असे दर्शन

मुंबई :  मुंबई महापालिकेत मागील पाच वर्ष केवळ पहारेकरी म्हणून काम करणाऱ्या भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची

जे जे उड्डाणपूलाखाली परिसरातील वर्षानुवर्षांच्या कचऱ्यांसह अतिक्रमणांची जळमटेही केली दूर

मुंबई : दक्षिण मुंबईतील जे जे उड्डाणपूलाखालील भागात मागील काही वर्षांपासून अतिक्रमण होऊन मोठ्याप्रमाणात

मंत्रालयात लाच घेताना लिपिकाला अटक

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे

रेस्टॉरंट्सकडून 'सर्व्हिस चार्ज' आकारणी; मुंबई ग्राहक पंचायतीची कारवाईची मागणी

मुंबई  : 'सर्व्हिस चार्ज देणे हे सक्तीचे नसून तो देणे हा ग्राहकांच्या पूर्णपणे स्वेच्छेवर अवलंबून असताना