Allu Arjun Arrested Updates : अल्लू अर्जुनला हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

  110

हैदराबाद : 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनला (Allu Arjun) आज तेलंगणा पोलिसांनी अटक केली होती. हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्लू अर्जुनला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अल्लू अर्जुनला आधी नामपल्ली कोर्टाने १४ दिवसांची कोठडी सुनावली होती. यानंतर हायकोर्टाने धाव घेतली. आता सुपरस्टार पुष्पा फेम आली अर्जुनला दिलासा मिळाला आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने या प्रकरणात अल्लू अर्जुनचा जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे. पोलिसांनी आज सकाळीच अभिनेत्याला त्याच्या हैदराबाद येथील घरातून अटक करण्यात आली होती. ‘पुष्पा २’च्या प्रिमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. मृत पत्नीच्या पतीने अभिनेत्याविरोधात चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती. अटक केल्यानंतर आज सकाळी अभिनेत्याला हैदराबाद पोलिसांनी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले होते.


उच्च न्यायालयाकडून निर्णय आला त्यावेळी अल्लू अर्जुनला कनिष्ठ न्यायालयाकडून चेंगराचेंगरी प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक करताच त्याने त्याच्या वकिलाच्या माध्यमातून तातडीने सुनावणीची मागणी करत हायकोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, आता उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला मोठा दिलासा देत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.



उच्च न्यायालयाने अभिनेत्याचा जामीन मंजूर केल्यानंतर अल्लू अर्जुन भावुक झालेला दिसला. आज सकाळीच पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते. तेव्हा त्याची पत्नी चिंतेत दिसली. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाले. मला ना धड नाश्ता करु दिला ना कपडे बदलायचा वेळ दिला अशी तक्रार अल्लू अर्जुनने केली होती. दिवसभरात पोलिस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढल्यानंतर अखेर त्याला दिलासा मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी अल्लू अर्जुनच्या अटकेचा तीव्र निषेध केला. “अल्लू अर्जुन चेंगराचेंगरीत सहभागी नव्हता, त्यामुळे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला अटक करणे मान्य नाही, मी अटकेचा निषेध करतो.” असे त्यांनी म्हटलंय.


Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या