डोंबिवलीच्या निवासी परिसरात पुन्हा प्रदूषण वाढले, नागरिक हैराण 

डोंबिवली: एमआयडीसी निवासी आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही महिन्यात रासायनिक प्रदूषण वाढल्याचा तक्रारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात येत असल्याचे दिसत आहे. आठवड्यातील दोन ते तीन दिवस रासायनिक गॅस हा रात्री, पहाटे, सकाळी निवासी आणि आजूबाजूच्या परिसरात, गावांत सोडण्यात येत आहे. विधानसभा निवडणुक आचारसंहितेचा काळात या प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले होते.


वाढत्या प्रदूषणाबाबत येथील काही ज्येष्ठ, तरुण नागरिक सुरेखा माधव जोशी, वसंत शिंदे, महेश नाईक इत्यादीजण आपल्या तक्रारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण कार्यालयातील उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी व इतर अधिकाऱ्यांकडे दूरध्वनी आणि मेसेज द्वारे अशा तक्रारी केल्याचे समोर येत आहे. त्या तक्रारी नंतर काही अधिकारी तपासणीसाठी येतात तेव्हा सदर हा विषारी गॅस गायब झालेला असतो असे अनुभव लोक सांगत आहेत. प्रदूषण संदर्भात तक्रारी नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कामा या संघटनेतील पदाधिकाऱ्याला पाठवून त्यांच्याकडून चौकशी, तपासणी केली जात असल्याचे समोर येत आहे. अशा व्यवस्थेमुळे येथील नागरिकांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाबाबत विश्वासार्हता राहिली नाही अशी चर्चा होत आहे.


यामुळे सद्य स्थितीत काही जण येथील आपली घरे विकून किंवा भाड्याने देवून येथून सोडून जावू लागले आहेत. डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात याबद्दल विचारले तर ते प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी करा असा सल्ला देतात. यापुढेही असेच रासायनिक प्रदूषण होत राहिले तर येथील नागरिक मोठ्या आंदोलनाच्या पावित्र्यात असून एमपीसीबी, एमआयडीसी कार्यालयावर धडक मारून त्याच्या जाब विचारणार आहेत. याबात एमआयडीसीतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Comments
Add Comment

नागपूरला मिळणार आधुनिक मासळी बाजार- मुख्यमंत्र्यांनी मानले मंत्री नितेश राणेंचे आभार; नाथूबाबा यांचे नाव देण्याबाबत सकारात्मक विचार

नागपूर : "प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत नागपूर शहरात आधुनिक मासळी बाजार केंद्र उभारले जाणार आहे. आमचे

'फनेल झोन'सह मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा - हाऊसिंग फॉर ऑल’ योजनेची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा; दहिसर आणि जुहूतील रडारचे स्थलांतर होणार

नागपूर : 'फनेल झोन'सह मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यासाठी राज्य

महाराष्ट्राची सागरी सुरक्षा बळकट होणार- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे; १५ हाय स्पीड गस्ती नौका लवकरच दाखल होणार

नागपूर : परराज्यातून महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात येणाऱ्या मच्छिमार नौकांमुळे राज्यातील मच्छिमारांचे

मत्स्यव्यवसाय संस्थांच्या नोंदणीला स्थगिती - मंत्री नितेश राणेंची नागपुरात मोठी घोषणा; मच्छीमार बांधवांच्या वतीने भव्य सत्कार

नागपूर : राज्यातील भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी दि. १२ मे २०२३ च्या शासन निर्णयाला

लाडक्या बहिणींना 'ई-केवायसी' दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी

मंत्री अदिती तटकरे; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिंदे सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'; गृहनिर्माण क्षेत्रात ऐतिहासिक निर्णय, लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा

नागपूर : "मुंबईबाहेर गेलेला चाकरमानी पुन्हा मुंबईत परतला पाहिजे, हीच स्व. बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि ती