डोंबिवलीच्या निवासी परिसरात पुन्हा प्रदूषण वाढले, नागरिक हैराण 

डोंबिवली: एमआयडीसी निवासी आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही महिन्यात रासायनिक प्रदूषण वाढल्याचा तक्रारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात येत असल्याचे दिसत आहे. आठवड्यातील दोन ते तीन दिवस रासायनिक गॅस हा रात्री, पहाटे, सकाळी निवासी आणि आजूबाजूच्या परिसरात, गावांत सोडण्यात येत आहे. विधानसभा निवडणुक आचारसंहितेचा काळात या प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले होते.


वाढत्या प्रदूषणाबाबत येथील काही ज्येष्ठ, तरुण नागरिक सुरेखा माधव जोशी, वसंत शिंदे, महेश नाईक इत्यादीजण आपल्या तक्रारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण कार्यालयातील उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी व इतर अधिकाऱ्यांकडे दूरध्वनी आणि मेसेज द्वारे अशा तक्रारी केल्याचे समोर येत आहे. त्या तक्रारी नंतर काही अधिकारी तपासणीसाठी येतात तेव्हा सदर हा विषारी गॅस गायब झालेला असतो असे अनुभव लोक सांगत आहेत. प्रदूषण संदर्भात तक्रारी नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कामा या संघटनेतील पदाधिकाऱ्याला पाठवून त्यांच्याकडून चौकशी, तपासणी केली जात असल्याचे समोर येत आहे. अशा व्यवस्थेमुळे येथील नागरिकांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाबाबत विश्वासार्हता राहिली नाही अशी चर्चा होत आहे.


यामुळे सद्य स्थितीत काही जण येथील आपली घरे विकून किंवा भाड्याने देवून येथून सोडून जावू लागले आहेत. डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात याबद्दल विचारले तर ते प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी करा असा सल्ला देतात. यापुढेही असेच रासायनिक प्रदूषण होत राहिले तर येथील नागरिक मोठ्या आंदोलनाच्या पावित्र्यात असून एमपीसीबी, एमआयडीसी कार्यालयावर धडक मारून त्याच्या जाब विचारणार आहेत. याबात एमआयडीसीतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या