डोंबिवलीच्या निवासी परिसरात पुन्हा प्रदूषण वाढले, नागरिक हैराण 

डोंबिवली: एमआयडीसी निवासी आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही महिन्यात रासायनिक प्रदूषण वाढल्याचा तक्रारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात येत असल्याचे दिसत आहे. आठवड्यातील दोन ते तीन दिवस रासायनिक गॅस हा रात्री, पहाटे, सकाळी निवासी आणि आजूबाजूच्या परिसरात, गावांत सोडण्यात येत आहे. विधानसभा निवडणुक आचारसंहितेचा काळात या प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले होते.


वाढत्या प्रदूषणाबाबत येथील काही ज्येष्ठ, तरुण नागरिक सुरेखा माधव जोशी, वसंत शिंदे, महेश नाईक इत्यादीजण आपल्या तक्रारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण कार्यालयातील उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी व इतर अधिकाऱ्यांकडे दूरध्वनी आणि मेसेज द्वारे अशा तक्रारी केल्याचे समोर येत आहे. त्या तक्रारी नंतर काही अधिकारी तपासणीसाठी येतात तेव्हा सदर हा विषारी गॅस गायब झालेला असतो असे अनुभव लोक सांगत आहेत. प्रदूषण संदर्भात तक्रारी नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कामा या संघटनेतील पदाधिकाऱ्याला पाठवून त्यांच्याकडून चौकशी, तपासणी केली जात असल्याचे समोर येत आहे. अशा व्यवस्थेमुळे येथील नागरिकांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाबाबत विश्वासार्हता राहिली नाही अशी चर्चा होत आहे.


यामुळे सद्य स्थितीत काही जण येथील आपली घरे विकून किंवा भाड्याने देवून येथून सोडून जावू लागले आहेत. डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात याबद्दल विचारले तर ते प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी करा असा सल्ला देतात. यापुढेही असेच रासायनिक प्रदूषण होत राहिले तर येथील नागरिक मोठ्या आंदोलनाच्या पावित्र्यात असून एमपीसीबी, एमआयडीसी कार्यालयावर धडक मारून त्याच्या जाब विचारणार आहेत. याबात एमआयडीसीतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या