Delhi Schools: दिल्लीच्या शाळांना पुन्हा बॉम्बची धमकी देणारा कॉल, तपास सुरू

नवी दिल्ली: दिल्लीच्या अनेक शाळांमध्ये शुक्रवारच्या सकाळी एक धमकीवजा फोन आला. कॉलची माहिती दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. यानंतर लगेचच तपास सुरू करण्यात आला. तपासात अद्याप पर्यंत काही संशयास्पद आढळलेले नाही. ज्या शाळांना बॉम्बची धमकी मिळाली आहे त्यात ईस्ट ऑफ कैलाश डीपीएस, सलवान स्कूल, मॉडर्न स्कूल आणि केंब्रिज स्कूलचा समावेश आहे.

याआधी ८ डिसेंबरला आला होता मेल


याआधी दिल्लीच्या ४० हून अधिक शाळांना ८ डिसेंबरला रात्री ११.३८च्या सुमारास याच पद्धतीचा धमकीवजा ईमेल आला होता. यात दावा करण्यात आला होता की त्यांनी कॅम्पसमध्ये बॉम्ब लावले आहेत. मेलमध्ये म्हटले होते की बॉम्ब फुटले तर मोठे नुकसान होईल. मेल पाठवणाऱ्या स्फोट रोखण्यासाठी ३० हजार डॉलरची मागणी केली होती.

शाळा व्यवस्थापनाने तातडीने कारवाई करताना मुलांना परत पाठवले होते. तसेच फायर ब्रिगेड आणि पोलिसांना सूचना दिली होती. तपासानंतर हा मेल फेक असल्याचे समजले होते.
Comments
Add Comment

INS Anjdip : शत्रूला धडकी भरणार! 'आयएनएस अंजदीप' भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

चेन्नई : आयएनएस अंजदीप, ही पाणबुडी विरोधी युद्धनौका , ‘शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) प्रकल्पातील

National Science Day 2026 : विकास आणि कल्याणासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करा - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा देत भारताच्या

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत