मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांची रखडपट्टी

  48

दहा दिवसांत कंत्राट संपणाऱ्या कंत्राटदारांचे काय?


वाडा : वाडा तालुका देशातील बहुतेक एकमेव तालुका असेल ज्यात एकही रस्ता खड्डेमुक्त नाही आणि याच गोष्टीची तालुक्यातील वाहन चालकांना मोठी डोकेदुखी झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांचे तालुक्यात मोठे जाळे पसरले आहे मात्र बहुतांश रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, तर अनेक मंजूर रस्ते अतिशय धीम्या गतीने सुरू आहेत. एका नामांकित कंत्राटदाराच्या कामांचा यात विशेष समावेश असुन मुदत संपणाऱ्या कंत्राटदारांवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना काय कारवाई करणार असा सवाल लोकांनी उपस्थित केला आहे. खूपरी - देवगाव मार्गे अबिटघर या जवळपास ९ किमी अंतराचे काम डिसेंबर २०२३ या वर्षात एका नामांकित कंपनीला सोपविण्यात आले असून यासाठी तब्बल ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.



मुदत संपायची तारीख अवघ्या दहा दिवसांवर येऊनही बहुतांश काम अपूर्ण असून लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डाहे ते पीक या साडेपाच किमी मार्गाचे कंत्राट याचे कंपनीला देण्यात आले असून त्यासाठी तब्बल ५.३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. २० डिसेंबरला या कामाची मुदत संपत असूनही रस्त्याचे बहुतांश काम अपूर्णच आहे.
वाडा तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची कामे मुदत संपूनही अपूर्णच असून जणू फलकावर मुदतीचा कालावधी लिहिणे ही एक औपचारिकता किंवा जनतेची मस्करी आहे असेच जाणवते. कंत्राटदार आपल्या हव्यासापोटी वाटेल तितकी कामे स्विकारतात मात्र मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कोणतीही यंत्रणा कारवाई दिसत नाही. सरकारी गाफिलता कंत्राटदारांना खतपाणी घालते का असा सवाल लोकांनी उपस्थित केला असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांचे करायचे काय असा प्रश्न लोकांना पडला आहे.


शाखा अभियंता विनोद घोलप यांना विचारणा केली असता अबिटघर - खुपरी मार्गाचे काम सुरळीत सुरु आहे तर डाहे ते पीक मार्गाचे काम आजपासून सुरू होईल असे ठरलेले उत्तर त्यांनी दिले.

Comments
Add Comment

पालिका अधिकाऱ्याकडे ३१ कोटींची अपसंपदा

लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल विरार  : वसई-विरार महापालिकेचे निलंबित उपसंचालक नगररचना वाय.एस. रेड्डी

जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला

अवैध बांधकामांना माजी आयुक्तच जबाबदार

‘ईडी’ कार्यालयाकडून भांडाफोड विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार

वसईत 'भूतांचा' अनोखा आंदोलन: स्मशानभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न!

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने

घोडबंदर ते तलासरी महामार्ग धोकादायक स्थितीत

तातडीने लक्ष द्यावे अशी खासदारांची मागणी वाडा : पालघर लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८

प्रियकरासोबत रंगेहाथ सापडल्याने पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

घरातच गाडले, भावानेच घरातील फरशा बदलल्या नालासोपारा : नालासोपारा येथे प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले गेल्यानंतर