Vasai Virar : वसई - विरार शहरातील वाहनतळाची समस्या जटिल

पार्किंगला जागा द्या, मग टोइंग करा : नागरिकांची मागणी


वसई : वसई - विरार शहर महानगरपालिकेकडे ६८ भूखंड राखीव आहे तरी देखील शहरातील वाहनतळाची समस्या जटिल बनू लागली आहेत. शहरात पालिकेकडे वाहनतळ नसल्यामुळे नागरिकांना शहरात मिळेल त्याठिकाणी वाहने उभी करून साहित्याची खरेदीसाठी जावे लागते. उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांडून कारवाई होत असल्याने नागरिकांना दुतर्फा दंड सहन करावा लागत असल्यामुळे नागरिकांनी पार्किंगला जागा द्या, मग टोइंग करा अशी मागणी करण्यात आली आहे.



वसई-विरार शहराची लोकसंख्या पालिकेने दिलेल्या माहितीनुसार ३२ लाखांच्या घरात गेली आहे. यामुळे शहरातील रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात गुजरात गॅस कंपनीने आणि जल योजना यांच्या माध्यमातून दुतर्फा खोदून ठेवलेले आहे. त्यामध्ये शहरातील अवैध फेरीवाले, अवैध रिक्षा स्थानके, दुकानदारांनी वाढवेलेले अवैध शेड यांच्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे.

त्यात पालिकेने अद्याप नागरिकांसाठी वाहनतळाची सुविधा उपलब्ध केली नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव वर्दळीच्या ठिकाणी मिळेल त्या जागेवर आपली वाहने उभी करून सामानाची खरेदी करावी लागत आहे; मात्र उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत असल्यामुळे वाहन चालक आणि वाहतूक पोलिस असा नवा वाद निर्माण झाला आहे.

वसई-विरार शहर पालिकेने शहरातील वाहनतळाची समस्या दूर करण्यासाठी शहरातील १३ ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. मात्र टेंडर प्रक्रियेसाठी ठेकेदार आले नसल्यामुळे ती प्रक्रिया पुढे राबविता आली नाही अशी माहिती दै. प्रहारला दिली.
Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक