Winter session of Parliament : संसदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज उद्या, बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आलेय. विरोधकांना विविध विषयांवरून गदारोळ केल्यामुळे हे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.


​​​​​​​संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, कोणतेही मुद्दे असले तरी आम्ही सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणणार नाही. सपा, टीएमसी आणि काँग्रेससह विविध पक्षांचे अनेक खासदार माझ्याकडे आले. रिजिजू यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण काँग्रेस पक्षाला राज्यसभेत चर्चा करायची आहे, फक्त राहुल गांधींना संसदेच्या कामकाजात भाग घ्यायचा नाही. कदाचित त्यांचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नाही. सर्व खासदारांना चर्चा हवी असते, प्रत्येक खासदारासाठी त्याचा संसदीय मतदारसंघ महत्त्वाचा असतो.





राहुल यांच्यासाठी कोणताही मुद्दा महत्त्वाचा नाही असे रिजीजू यांनी सांगितले. तर काँग्रेस खासदार प्रियंका वाड्रा म्हणाल्या की, आम्ही जनतेसाठी विरोध करीत आहोत परंतु, सरकारलाच चर्चा नकोय. दररोज कोणत्या ना कोणत्या निमित्ताने सभागृहाचे कामकाज तहकूब केले जात आहे.

Comments
Add Comment

पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला, ६५ जण जखमी

पुणे : राजगड तालुक्यातील विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित पालखी सोहळ्यावर मधमाश्यांनी हल्ला केला.

पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर

संगमनेर रोडवरील मॉडर्न चायनीज दुकानावर दगडफेक; पाण्याच्या बाटलीच्या पैशांवरून वाद

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड परिसरात महाराष्ट्र वाईनच्या समोरील मॉडर्न चायनीज दुकानावर किरकोळ

Malegaon News : मालेगावच्या महासभेत सत्ताधारी एकमेकांशी भिडले

मालेगाव : मतदार याद्यांचे पुनर्निरिक्षणाच्या मुद्द्यावरून मालेगाव महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी एमआयएम आणि

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन

सोलापूर : श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ संपर्क कार्यालय येथे आज श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न