स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होत असताना उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प का? बावनकुळेंची टीका

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावकर यांचा कर्नाटक विधानसभेतून फोटो हटवल्याचे प्रकरण सुरू आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो हटवण्याचे कृत्य अतिशय निंदाजनक आहे. उद्धव ठाकरेंनी मात्र यावर अद्याप भाष्य केलेले नाही. ते झोपलेत की काय? जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारण्याचे नाव घेत नाहीत अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.


कर्नाटक सरकारने विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो हटवला. हा फोटो हटवत त्यांनी राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या भूमिकेला मूर्त रुप दिले आहे. राज्यात जेव्हा राहुल गांधी येतात तेव्हाही विरोधी भूमिका घेतात. सावरकरांचा अपमान होणे हे अतिशय निंदाजनक कृत्य आहे. असे असतानाही उद्धव ठाकरे मात्र गप्प आहेत. त्यांनी काँग्रेसचा निषेध का केला नाही. ते काँग्रेसच्या कळपातून बाहेर येत नाही. जनतेने या निवडणुकीत त्यांना चांगलेच धुवून काढले आहे. अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.


यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचे कौतुकही केले. फडणवीस हे समन्वय साधणारे नेते आहेत. फडणवीस, पवार आणि शिंदे योग्य तो समन्वय राखत काम करत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारातही हेच असेल.

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील