स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होत असताना उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प का? बावनकुळेंची टीका

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावकर यांचा कर्नाटक विधानसभेतून फोटो हटवल्याचे प्रकरण सुरू आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो हटवण्याचे कृत्य अतिशय निंदाजनक आहे. उद्धव ठाकरेंनी मात्र यावर अद्याप भाष्य केलेले नाही. ते झोपलेत की काय? जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारण्याचे नाव घेत नाहीत अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.


कर्नाटक सरकारने विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो हटवला. हा फोटो हटवत त्यांनी राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या भूमिकेला मूर्त रुप दिले आहे. राज्यात जेव्हा राहुल गांधी येतात तेव्हाही विरोधी भूमिका घेतात. सावरकरांचा अपमान होणे हे अतिशय निंदाजनक कृत्य आहे. असे असतानाही उद्धव ठाकरे मात्र गप्प आहेत. त्यांनी काँग्रेसचा निषेध का केला नाही. ते काँग्रेसच्या कळपातून बाहेर येत नाही. जनतेने या निवडणुकीत त्यांना चांगलेच धुवून काढले आहे. अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.


यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचे कौतुकही केले. फडणवीस हे समन्वय साधणारे नेते आहेत. फडणवीस, पवार आणि शिंदे योग्य तो समन्वय राखत काम करत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारातही हेच असेल.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत