स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होत असताना उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प का? बावनकुळेंची टीका

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावकर यांचा कर्नाटक विधानसभेतून फोटो हटवल्याचे प्रकरण सुरू आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो हटवण्याचे कृत्य अतिशय निंदाजनक आहे. उद्धव ठाकरेंनी मात्र यावर अद्याप भाष्य केलेले नाही. ते झोपलेत की काय? जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारण्याचे नाव घेत नाहीत अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.


कर्नाटक सरकारने विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो हटवला. हा फोटो हटवत त्यांनी राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या भूमिकेला मूर्त रुप दिले आहे. राज्यात जेव्हा राहुल गांधी येतात तेव्हाही विरोधी भूमिका घेतात. सावरकरांचा अपमान होणे हे अतिशय निंदाजनक कृत्य आहे. असे असतानाही उद्धव ठाकरे मात्र गप्प आहेत. त्यांनी काँग्रेसचा निषेध का केला नाही. ते काँग्रेसच्या कळपातून बाहेर येत नाही. जनतेने या निवडणुकीत त्यांना चांगलेच धुवून काढले आहे. अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.


यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचे कौतुकही केले. फडणवीस हे समन्वय साधणारे नेते आहेत. फडणवीस, पवार आणि शिंदे योग्य तो समन्वय राखत काम करत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारातही हेच असेल.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य