मराठी शाळेतील मोफत शिक्षणाकडे पालकांची पाठ, इंग्रजी शाळांना पसंती

  108

अमरावती : इंग्रजी शाळांचा खर्च पाहता मराठी शाळेतील मोफत शिक्षणाकडे पालकांनी पाठ फिरविल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येते. शिक्षण घेणे हा प्रत्येक बालकांचा हक्क आहे. यासाठीच राज्य शासनाने ग्रामीण व दुर्बल भागातील शिक्षण बाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे, यासाठी विविध उपक्रम राबवीत आहे.

शासनाच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. मात्र, या आधुनिक स्पर्धात्मक युगात गावापासून काही अंतरावर असलेल्या शहरात व मोठ्या गावातील इंग्रजी माध्यमाच्या कान्व्हेंट इंग्रजी शाळांमध्ये महागडे शुल्क भरून आपल्या मुला-मुलींना शिकवणीचा प्रयत्न सध्याचे पालक करीत आहेत.

केवळ एक फॅशन व स्पर्धा म्हणूनकरावी लागते. परिणामी परिसरात अनेक पालक कर्जबाजारी होऊन इंग्रजी शाळेचा खर्च पूर्ण करीत असल्याचे वास्तव दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे ग्रामीण भागातील इंग्रजी शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव असल्यामुळे शिस्तीच्या नावाखाली आणि आपल्या गावापासून शाळेपर्यंत येणे-जाणे करण्यासाठी बसची सुविधा आहे. ऐपत नसतानाही पालकांनी मोफत शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे. दुसरीकडे खाजगी शाळेच्या इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव वाढला आहे. मराठी शाळेतून विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत शिक्षण दिले जाते. मात्र, काही पालक याकडे दुर्लक्ष करून ऐपत नसतानाही महागड्या इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे नाव दाखल करून घेतात. मात्र, नंतर गरीब सामान्य पालकांना इंग्रजी शाळेचा खर्च पेलवत नसल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या