मराठी शाळेतील मोफत शिक्षणाकडे पालकांची पाठ, इंग्रजी शाळांना पसंती

अमरावती : इंग्रजी शाळांचा खर्च पाहता मराठी शाळेतील मोफत शिक्षणाकडे पालकांनी पाठ फिरविल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येते. शिक्षण घेणे हा प्रत्येक बालकांचा हक्क आहे. यासाठीच राज्य शासनाने ग्रामीण व दुर्बल भागातील शिक्षण बाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे, यासाठी विविध उपक्रम राबवीत आहे.

शासनाच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. मात्र, या आधुनिक स्पर्धात्मक युगात गावापासून काही अंतरावर असलेल्या शहरात व मोठ्या गावातील इंग्रजी माध्यमाच्या कान्व्हेंट इंग्रजी शाळांमध्ये महागडे शुल्क भरून आपल्या मुला-मुलींना शिकवणीचा प्रयत्न सध्याचे पालक करीत आहेत.

केवळ एक फॅशन व स्पर्धा म्हणूनकरावी लागते. परिणामी परिसरात अनेक पालक कर्जबाजारी होऊन इंग्रजी शाळेचा खर्च पूर्ण करीत असल्याचे वास्तव दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे ग्रामीण भागातील इंग्रजी शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव असल्यामुळे शिस्तीच्या नावाखाली आणि आपल्या गावापासून शाळेपर्यंत येणे-जाणे करण्यासाठी बसची सुविधा आहे. ऐपत नसतानाही पालकांनी मोफत शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे. दुसरीकडे खाजगी शाळेच्या इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव वाढला आहे. मराठी शाळेतून विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत शिक्षण दिले जाते. मात्र, काही पालक याकडे दुर्लक्ष करून ऐपत नसतानाही महागड्या इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे नाव दाखल करून घेतात. मात्र, नंतर गरीब सामान्य पालकांना इंग्रजी शाळेचा खर्च पेलवत नसल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा