मराठी शाळेतील मोफत शिक्षणाकडे पालकांची पाठ, इंग्रजी शाळांना पसंती

अमरावती : इंग्रजी शाळांचा खर्च पाहता मराठी शाळेतील मोफत शिक्षणाकडे पालकांनी पाठ फिरविल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येते. शिक्षण घेणे हा प्रत्येक बालकांचा हक्क आहे. यासाठीच राज्य शासनाने ग्रामीण व दुर्बल भागातील शिक्षण बाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे, यासाठी विविध उपक्रम राबवीत आहे.

शासनाच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. मात्र, या आधुनिक स्पर्धात्मक युगात गावापासून काही अंतरावर असलेल्या शहरात व मोठ्या गावातील इंग्रजी माध्यमाच्या कान्व्हेंट इंग्रजी शाळांमध्ये महागडे शुल्क भरून आपल्या मुला-मुलींना शिकवणीचा प्रयत्न सध्याचे पालक करीत आहेत.

केवळ एक फॅशन व स्पर्धा म्हणूनकरावी लागते. परिणामी परिसरात अनेक पालक कर्जबाजारी होऊन इंग्रजी शाळेचा खर्च पूर्ण करीत असल्याचे वास्तव दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे ग्रामीण भागातील इंग्रजी शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव असल्यामुळे शिस्तीच्या नावाखाली आणि आपल्या गावापासून शाळेपर्यंत येणे-जाणे करण्यासाठी बसची सुविधा आहे. ऐपत नसतानाही पालकांनी मोफत शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे. दुसरीकडे खाजगी शाळेच्या इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव वाढला आहे. मराठी शाळेतून विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत शिक्षण दिले जाते. मात्र, काही पालक याकडे दुर्लक्ष करून ऐपत नसतानाही महागड्या इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे नाव दाखल करून घेतात. मात्र, नंतर गरीब सामान्य पालकांना इंग्रजी शाळेचा खर्च पेलवत नसल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Comments
Add Comment

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी