Solapur News : मका पिकाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांची नाराजी

सोलापूर : पावसातून वाचलेल्या मका पिकाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांची नाराजी आणखी वाढली आहे. मक्याचे दर वाढण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे मका उत्पादक शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट निर्माण होत आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मक्याला गेल्या दोन महिन्यांपासून चांगला भाव मिळत नाही. मात्र, लागवड खर्चात वाढ होत आहे. तरीही दरात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. शासनाने मका खरेदी केंद्र चालू करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. मक्याच्या व्यापार्‍याकडून शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे.


प्रतिक्विंटल ३ हजार रुपयांपर्यंत मिळणारा दर आता घसरून २१०० रुपयांवर आला आहे. मक्यामध्ये ओलावा असल्याचे कारण देत व्यापारी दर देत नाहीत. अतिवृष्टीतून वाचविलेले मका बाजारात विक्रीसाठी आणल्यानंतर दर मिळत नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. दर प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २२०० रुपयांपर्यंत आहेत. मका उत्पादनासाठी काढणी व मळणी वगळता एकरी २० हजारांचा खर्च करावा लागतो. पाच वर्षांपूर्वी (२०२०-२१) नांगरणीचा खर्च १२०० रुपये, बियाणे प्रतिबॅग ८०० ते १५००, युरिया २४०, डीएपीसह मिश्रखते १०५० ते ११३० रुपयांना मिळत होती. दोन वेळच्या तणनाशकाचा खर्च १६००, तर तीनवेळा कीटकनाशक फवारणीचा खर्च ३००० रुपयांपर्यंत होता. काढणीसाठी अडीच हजारांपर्यंत, तर मळणीसाठी प्रतिपोती ७० रुपयांचा दर होता. त्यात आत दुपटीने वाढ झाली आहे. तुलनेत हमीभावात वाढ झाली नाही. गेल्या दोन वर्षांपासून मक्याला चांगला दर मिळत नाही. तोच नवीन आवक झाली आहे. या मक्याला २ हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे.


मक्याच्या दरात वाढ होत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. सध्या मिळणार्‍या दरातून उत्पादन खर्चही शेतकर्‍यांच्या पदरात पडत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याच्या दरात मंदी पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेत जाणवत आहे. सांगोला तालुक्यात शासनाने मका खरेदी केंद्र चालू करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

Comments
Add Comment

मंदिरांच्या जमिनी वाचवण्यासाठी विशेष कायदा करा!

नागपूर : भूमाफियांनी राज्यातील देवस्थानांच्या शेकडो एकर शेतजमिनी हडपल्याने त्यांच्या संरक्षणासाठी गुजरात आणि

छोटी राज्ये चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात! - वेगळ्या विदर्भाबाबतच्या प्रश्नावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे उत्तर

नागपूर : "छोटी राज्ये ही अधिक चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात. त्यामुळे याबाबत भाजपचा नेहमीच पुढाकार राहिला

संगमनेर येथील 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न मार्गी

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे

पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांविरोधात मोठी कारवाई

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि

नाशिक - पुणे रेल्वे मार्गात बदल, अहिल्यानगरचे नागरिक नाराज

नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या

दीपावलीला युनेस्कोचा दर्जा; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात केले निवेदन

नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जगभर