Mumbai Accident : करिअर सुरु होताच काळाचा घाला! भीषण अपघातात २५ वर्षीय मॉडेलचा मृत्यू, आरोपी चालक फरार

  98

मुंबई : मुंबईत पुन्हा हिट अ‍ॅण्ड रनची (Hit And Run) घटना घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका २५ वर्षीय मॉडेलचा मृत्यू झाला आहे. बाईक आणि डंपरची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला असून अपघातानंतर डंपर चालक फरार झाला आहे. मुंबई पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. (Mumbai Accident)



मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे गुरुवारी भीषण अपघात झाला. शिवानी सिंह नावाची २५ वर्षीय मॉडेल तिच्या मित्रासोबत बाईकने प्रवास करत होती. रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी वांद्रे पश्चिम येथील कलंत्री चौकात आली. यावेळी एका असता एका डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत शिवानीचा तोल गेल्याने ती गंभीर जखमी झाली. यानंतर जखमी अवस्थेत स्थानिकांनी शिवानी आणि तिचा मित्र दोघांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी शिवानी सिंहला मृत घोषित केले.


दरम्यान या घटनेनंतर टँकरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. टँकर जप्त करण्यात आला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, लवकरच आरोपी टँकरचालकाला अटक केले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.



करियरला सुरुवात होताच काळाचा घाला


मृत शिवानी सिंह ही २५ वर्षीय तरुणी मॉडेल असून ती मालाड पश्चिम येथे वास्तव्यास आहे, ती चित्रपटसृष्टीत काम करते. शिवानी सिंहला नुकतेच इंडस्ट्रीमध्ये काम मिळण्यास सुरुवात झाली होती. मात्र अशातच तिच्यावर काळाने घाला घातला. शिवानीच्या अपघाती मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे. (Mumbai Accident)

Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये