Eknath Shinde : ईव्हीएमचं रडगाणं सोडून विकासाचं गाणं गा!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर


मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) निकालात महायुती (Mahayuti) सरकारला घवघवीत यश प्राप्त झालं असून मुख्यमंत्री शपथविधी सोहळा देखील पार पडला आहे. सध्या महाराष्ट्रातील आमदारांचा शपथविधी सुरु आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यापासून अजूनही विरोधकांचे ईव्हीएम मशीनवरुन (EVM Machine) आरोप-प्रत्यारोप करणं सुरुच आहे. या आरोपांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.



निवडणुकीत जेव्हा महाविकास आघाडीच्या (MVA) बाजूने निकाल लागतो तेव्हा ईव्हीएम मशीन चांगल्या असतात. पण जेव्हा निकाल विरोधात लागतो तेव्हा मविआच्या नेत्यांकडून ईव्हीएम घोटाळ्याची ओरड सुरु होते. विरोधी पक्षाकडे आता मुद्दा राहिलेला नाही. जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. त्यामुळे आता त्यांनी 'ईव्हीएमचे रडगाणे न गाता विकासाचे गाणे गायला पाहिजे', असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.


त्याचबरोबर नाना पटोले २०० मतांनी जिंकले, रोहित पवार ११०० मतांनी जिंकले, मग काय म्हणायचं? कोणी काही करु शकतं का? संविधान आहे, लोकशाही आहे. जनमताचे स्वागत केले पाहिजे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या