Eknath Shinde : ईव्हीएमचं रडगाणं सोडून विकासाचं गाणं गा!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर


मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) निकालात महायुती (Mahayuti) सरकारला घवघवीत यश प्राप्त झालं असून मुख्यमंत्री शपथविधी सोहळा देखील पार पडला आहे. सध्या महाराष्ट्रातील आमदारांचा शपथविधी सुरु आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यापासून अजूनही विरोधकांचे ईव्हीएम मशीनवरुन (EVM Machine) आरोप-प्रत्यारोप करणं सुरुच आहे. या आरोपांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.



निवडणुकीत जेव्हा महाविकास आघाडीच्या (MVA) बाजूने निकाल लागतो तेव्हा ईव्हीएम मशीन चांगल्या असतात. पण जेव्हा निकाल विरोधात लागतो तेव्हा मविआच्या नेत्यांकडून ईव्हीएम घोटाळ्याची ओरड सुरु होते. विरोधी पक्षाकडे आता मुद्दा राहिलेला नाही. जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. त्यामुळे आता त्यांनी 'ईव्हीएमचे रडगाणे न गाता विकासाचे गाणे गायला पाहिजे', असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.


त्याचबरोबर नाना पटोले २०० मतांनी जिंकले, रोहित पवार ११०० मतांनी जिंकले, मग काय म्हणायचं? कोणी काही करु शकतं का? संविधान आहे, लोकशाही आहे. जनमताचे स्वागत केले पाहिजे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Comments
Add Comment

संगमनेरमध्ये नाशिक-पुणे महामार्गावर मोठी कारवाई

कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त संगमनेर : संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असतानाच, आज

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

Gold Silver Rate Today: सोन्याचांदीचे दर सलग दुसऱ्यांदा तुफान गडगडले एका दिवसात सोने प्रति ग्रॅम १९६० रूपये तर चांदीत एका दिवसात ४.५०% घसरण

मोहित सोमण: जागतिक बाजारपेठेत सोने सलग दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात घसरले आहे. प्रामुख्याने युएस बाजारातील फेडरल

Utakarsh Small Finance Bank Q2Results: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा तिमाही निकाल जाहीर यंदा तिमाहीत बँकेला ३४८ कोटींचा निव्वळ तोटा

मोहित सोमण: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला आहे. या निकालातील माहितीनुसार, बँकेला

आरबीआयची मोठी अपडेट- टॅरिफला कंटाळलेल्या निर्यातदारांना आरबीआयकडून खुप मोठा दिलासा फेमा कायद्यात फेरबदल जाहीर

मुंबई:विशेषतः केंद्र सरकार टॅरिफ फटक्यातून मुक्त करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. त्यातील पुढील अध्याय म्हणजे

अखेर पुन्हा 'युटर्न' अखेर निवडणूकीत फटका बसल्याने अंतर्गत दबावामुळे भारतीय आंबा, डाळिंब, चहावरील शुल्क ट्रम्पनी हटवले !

प्रतिनिधी:लोकांच्या गरजा व महागाई, रोजगार निर्मिती यावर निर्णय न घेता राष्ट्रीय धोरण, एच१बी व्हिसा, व्यापारी