Eknath Shinde : ईव्हीएमचं रडगाणं सोडून विकासाचं गाणं गा!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर


मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) निकालात महायुती (Mahayuti) सरकारला घवघवीत यश प्राप्त झालं असून मुख्यमंत्री शपथविधी सोहळा देखील पार पडला आहे. सध्या महाराष्ट्रातील आमदारांचा शपथविधी सुरु आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यापासून अजूनही विरोधकांचे ईव्हीएम मशीनवरुन (EVM Machine) आरोप-प्रत्यारोप करणं सुरुच आहे. या आरोपांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.



निवडणुकीत जेव्हा महाविकास आघाडीच्या (MVA) बाजूने निकाल लागतो तेव्हा ईव्हीएम मशीन चांगल्या असतात. पण जेव्हा निकाल विरोधात लागतो तेव्हा मविआच्या नेत्यांकडून ईव्हीएम घोटाळ्याची ओरड सुरु होते. विरोधी पक्षाकडे आता मुद्दा राहिलेला नाही. जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. त्यामुळे आता त्यांनी 'ईव्हीएमचे रडगाणे न गाता विकासाचे गाणे गायला पाहिजे', असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.


त्याचबरोबर नाना पटोले २०० मतांनी जिंकले, रोहित पवार ११०० मतांनी जिंकले, मग काय म्हणायचं? कोणी काही करु शकतं का? संविधान आहे, लोकशाही आहे. जनमताचे स्वागत केले पाहिजे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Comments
Add Comment

भारत व रशिया यांच्यातील अणुभट्ट्या प्रकल्पांना वेग पुतीन व मोदी यांच्यात महत्वाची चर्चा

नवी दिल्ली: भारत व रशिया यांच्यातील संबंध आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही देश आता नव्या एकत्र येत

भारत-रशियामधील महत्त्वपूर्ण करारानंतर अमेरिकेत खळबळ! नवी नॅशनल सिक्योरिटी स्टॅटजी जारी करण्याचा राष्ट्राध्यक्षांचा निर्णय

अमेरिका: रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी पुतिन आणि

ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन... भाषणाची सुरुवात करताना लक्षात ठेवा 'हे' मुद्दे

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६९वा महापरिनिर्वाण दिन आहे. या

इंदू मिलच्या जागेत महामानवाचे स्मारक प्रगतिपथावर

प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्राची संरचनात्मक कामे पूर्ण मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा