Mumbai Pollution : दिल्लीनंतर मुंबईत धोक्याची घंटा! प्रदुषणाच्या पातळीत वाढ

मुंबई : राज्यभरात वाढते औद्योगिकीकरण, कारखाने, शहरीकरण, बांधकाम धूळ, वाहनांचे उत्सर्जन आणि कचरा प्रक्रिया केंद्रे यामुळे प्रदुषणाचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे प्रदुषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर आता स्मार्ट सिटी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबईलाही प्रदुषणामुळे धोक्याची घंटा दिली आहे. (Mumbai Pollution)



मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दिल्ली प्रदुषणाचा AQI सध्या 350 आहे. हाच आकडा मुंबई कुर्ला भागातही झाला आहे. या वाढत्या प्रदुषणामुळे अनेकांच्या श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत.


मुंबईतील काही उपनगरांमध्ये हवेतील सूक्ष्मकण PM2.5 ची पातळी 150 µg/m³ पेक्षा अधिक आहे. काल ही पातळी 100 µg/m³ होती, प्रदुषणाची ही पातळी राष्ट्रीय सुरक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधीच काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Mumbai Pollution)



प्रदुषणापासून कसे दूर ठेवाल? 



  • प्रदुषणापासून दूर ठेवायचे असेल घराबाहेर जाताना मास्कचा वापर करा.

  • प्रदूषणामुळे डोळ्यांना होणारं नुकसान टाळण्यासाठी घराबाहेर पडताना चष्मा घाला. हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे टाळा. तसेच डोळे निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि भाज्या खा.

  • प्रदुषणामुळे श्वसनाचा त्रास होत असल्यास घरामध्ये काही झाडे ठेवू शकता ज्यामुळे घराची हवा स्वच्छ होईल.

Comments
Add Comment

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता

महापालिकेच्या चार रुग्णालयांची ऑक्सिजन लेव्हल वाढणार, कोविड काळातील त्या...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड काळात निर्माण केलेल्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन टाक्यांचा

कार्तिकी यात्रेसाठी जादा ११५० एसटी बस सोडणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): बंदा क्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक