Mumbai Pollution : दिल्लीनंतर मुंबईत धोक्याची घंटा! प्रदुषणाच्या पातळीत वाढ

  69

मुंबई : राज्यभरात वाढते औद्योगिकीकरण, कारखाने, शहरीकरण, बांधकाम धूळ, वाहनांचे उत्सर्जन आणि कचरा प्रक्रिया केंद्रे यामुळे प्रदुषणाचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे प्रदुषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर आता स्मार्ट सिटी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबईलाही प्रदुषणामुळे धोक्याची घंटा दिली आहे. (Mumbai Pollution)



मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दिल्ली प्रदुषणाचा AQI सध्या 350 आहे. हाच आकडा मुंबई कुर्ला भागातही झाला आहे. या वाढत्या प्रदुषणामुळे अनेकांच्या श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत.


मुंबईतील काही उपनगरांमध्ये हवेतील सूक्ष्मकण PM2.5 ची पातळी 150 µg/m³ पेक्षा अधिक आहे. काल ही पातळी 100 µg/m³ होती, प्रदुषणाची ही पातळी राष्ट्रीय सुरक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधीच काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Mumbai Pollution)



प्रदुषणापासून कसे दूर ठेवाल? 



  • प्रदुषणापासून दूर ठेवायचे असेल घराबाहेर जाताना मास्कचा वापर करा.

  • प्रदूषणामुळे डोळ्यांना होणारं नुकसान टाळण्यासाठी घराबाहेर पडताना चष्मा घाला. हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे टाळा. तसेच डोळे निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि भाज्या खा.

  • प्रदुषणामुळे श्वसनाचा त्रास होत असल्यास घरामध्ये काही झाडे ठेवू शकता ज्यामुळे घराची हवा स्वच्छ होईल.

Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.