Mumbai Pollution : दिल्लीनंतर मुंबईत धोक्याची घंटा! प्रदुषणाच्या पातळीत वाढ

मुंबई : राज्यभरात वाढते औद्योगिकीकरण, कारखाने, शहरीकरण, बांधकाम धूळ, वाहनांचे उत्सर्जन आणि कचरा प्रक्रिया केंद्रे यामुळे प्रदुषणाचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे प्रदुषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर आता स्मार्ट सिटी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबईलाही प्रदुषणामुळे धोक्याची घंटा दिली आहे. (Mumbai Pollution)



मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दिल्ली प्रदुषणाचा AQI सध्या 350 आहे. हाच आकडा मुंबई कुर्ला भागातही झाला आहे. या वाढत्या प्रदुषणामुळे अनेकांच्या श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत.


मुंबईतील काही उपनगरांमध्ये हवेतील सूक्ष्मकण PM2.5 ची पातळी 150 µg/m³ पेक्षा अधिक आहे. काल ही पातळी 100 µg/m³ होती, प्रदुषणाची ही पातळी राष्ट्रीय सुरक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधीच काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Mumbai Pollution)



प्रदुषणापासून कसे दूर ठेवाल? 



  • प्रदुषणापासून दूर ठेवायचे असेल घराबाहेर जाताना मास्कचा वापर करा.

  • प्रदूषणामुळे डोळ्यांना होणारं नुकसान टाळण्यासाठी घराबाहेर पडताना चष्मा घाला. हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे टाळा. तसेच डोळे निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि भाज्या खा.

  • प्रदुषणामुळे श्वसनाचा त्रास होत असल्यास घरामध्ये काही झाडे ठेवू शकता ज्यामुळे घराची हवा स्वच्छ होईल.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.