Mayawati : बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर मौन बाळगणा-या सपा आणि काँग्रेसवर मायावतींचा हल्लाबोल

लखनऊ : बांगलादेशातील हिंदूंवर (Bangladesh Hindu) होत असलेला अत्याचार आणि संभलमधील हिंसाचार प्रकरणी (Sambhal Masjid Controversy) मौन बाळगणा-या सपा आणि काँग्रेसवर बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी जोरदार हल्लाबोल केला.


मायावती यांनी शनिवारी बोलताना आरोप केला की काँग्रेस बांगलादेशविषयक मुद्यावर मौन बाळगून मुस्लिम मतांच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे.



मायावती म्हणाल्या, "सपा आणि काँग्रेस दोन्ही पक्ष संभलमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस, सपा आणि त्यांचे समर्थक या मुद्द्यावर एकाच माळेचे मणी आहेत. अशा परिस्थितीत भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पुढे जाऊन आपली जबाबदारी पार पाडावी, ज्यामुळे शोषित दलित वर्गाला आणखी त्रास सहन करावा लागणार नाही."


मायावती यांनी केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी संवाद साधून तिथून भारतीयांना भारतात परत आणण्याची मागणी केली. त्या पुढे म्हणाल्या, "संसदेतील विरोधी पक्ष राष्ट्रीय आणि जनहिताचे मुद्दे उचलण्याऐवजी, संभलमधील हिंसाचाराचा मुद्दा उचलून मुस्लिम मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत, विशेषतः सपा आणि काँग्रेस पक्ष. त्यांना इतर कोणत्याही मुद्द्यांशी काहीही संबंध नाही."


त्यांनी आरोप केला की, संभलमध्ये या पक्षांनी मुस्लिम समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. "मुस्लिम समाजाला सजग राहायला लागेल. हेच नाही, तर दलित वर्गाच्या खासदारांना संसदेत आणणारे लोक, त्यांच्या पक्षाच्या नेत्याला खुश करण्यासाठी दलित अत्याचारावर मौन राखत आहेत. ही एक शोकांतिका आहे," अशी टीका मायावती (Mayawati) यांनी केली.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला