Mayawati : बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर मौन बाळगणा-या सपा आणि काँग्रेसवर मायावतींचा हल्लाबोल

लखनऊ : बांगलादेशातील हिंदूंवर (Bangladesh Hindu) होत असलेला अत्याचार आणि संभलमधील हिंसाचार प्रकरणी (Sambhal Masjid Controversy) मौन बाळगणा-या सपा आणि काँग्रेसवर बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी जोरदार हल्लाबोल केला.


मायावती यांनी शनिवारी बोलताना आरोप केला की काँग्रेस बांगलादेशविषयक मुद्यावर मौन बाळगून मुस्लिम मतांच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे.



मायावती म्हणाल्या, "सपा आणि काँग्रेस दोन्ही पक्ष संभलमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस, सपा आणि त्यांचे समर्थक या मुद्द्यावर एकाच माळेचे मणी आहेत. अशा परिस्थितीत भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पुढे जाऊन आपली जबाबदारी पार पाडावी, ज्यामुळे शोषित दलित वर्गाला आणखी त्रास सहन करावा लागणार नाही."


मायावती यांनी केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी संवाद साधून तिथून भारतीयांना भारतात परत आणण्याची मागणी केली. त्या पुढे म्हणाल्या, "संसदेतील विरोधी पक्ष राष्ट्रीय आणि जनहिताचे मुद्दे उचलण्याऐवजी, संभलमधील हिंसाचाराचा मुद्दा उचलून मुस्लिम मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत, विशेषतः सपा आणि काँग्रेस पक्ष. त्यांना इतर कोणत्याही मुद्द्यांशी काहीही संबंध नाही."


त्यांनी आरोप केला की, संभलमध्ये या पक्षांनी मुस्लिम समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. "मुस्लिम समाजाला सजग राहायला लागेल. हेच नाही, तर दलित वर्गाच्या खासदारांना संसदेत आणणारे लोक, त्यांच्या पक्षाच्या नेत्याला खुश करण्यासाठी दलित अत्याचारावर मौन राखत आहेत. ही एक शोकांतिका आहे," अशी टीका मायावती (Mayawati) यांनी केली.

Comments
Add Comment

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया