“किमान पवारांनी तरी दिशाभूल करू नये”- मुख्यमंत्री

ईव्हीएम संदर्भातील शरद पवारांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांनी दिले ट्विटरवर प्रत्युत्तर


मुंबई : महायुतीला मिळालेली भरघोस मते आणि ईव्हीएम संदर्भात शरद पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलेय. याबाबत ट्विटरवर संदेश जारी करत किमान पवारांनी तरी जनतेची दिशाभूल करू नये असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.





विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मतांवर विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. निवडणुकीत ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. शरद पवार यांनीदेखील महायुतीला मिळालेल्या मतांबाबत शंका उपस्थित केली होती.


शरद पवार म्हणाले होते की, मोठ्या राज्यांमध्ये भाजप आणि छोट्या राज्यांमध्ये आम्ही आहोत. मतांची आकडेवारी बघून आश्चर्य वाटते. अजित दादा गटाची मत ५८ लाख मत असून त्यांचे ४१ उमेदवार निवडून आले. काँग्रेसला ८० लाख मत असताना त्यांचे १५ जण निवडून आले. निवडणूक निकालानंतर राज्यात उत्साह नाही, असे शरद पवार म्हणाले होते. महायुतीतील पक्षांना कमी मतं मिळून त्यांच्या जास्त जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीतील पक्षांना जास्त मत मिळून कमी जागा निवडून आल्या, याकडे पवारांनी लक्ष वेधले होते. याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर (एक्स) उत्तर दिले आहे.



जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? याबाबत सांगताना फडणवीसांनी गणित मांडले. २०२४ लोकसभेत भाजपाला १,४९,१३,९१४ मते मिळाली आणि जागा फक्त ९ मिळाल्या होत्या. पण काँग्रेसला ९६,४१,८५६ मते आणि १३ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला ७३,७७,६७४ मतं आणि ७ जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला ५८,५१,१६६ मते आणि ८ जागा होत्या.


यापूर्वीचे २०१९ च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला ८७,९२,२३७ मतं होती आणि १ जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला ८३,८७,३६३ मते होती आणि जागा ४ आल्याचे गणित फडणवीसांनी मांडले. आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका, असे फडणवीस म्हणाले. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, असे आवाहन फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शरद पवारांना केले आहे.

Comments
Add Comment

Monsoon Update : मुंबईत मान्सूनच्या आगमनासाठी २० जून उजाडणार ?

Mumbai: अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा सक्रिय असली तरी महाराष्ट्रातील मान्सूनचा पुढील प्रवास लांबल्याचे दिसत आहे.

Bhimashankar : ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पामुळे परिसराचे होणार परिवर्तन

मुंबई : भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात

Legal notice served to Amazon : महान गणितज्ञ ‘आर्यभट्ट’ यांच्या विडंबन प्रकरणी ॲमेझॉन इंडियाला कायदेशीर नोटीस!

मुंबई : प्राचीन भारताचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ 'आर्यभट्ट' यांचे व्यावसायिक जाहिरातीत अत्यंत हीन

Mumbai pune housing projects : महामुंबईतील २ लाख घरांचे स्वप्न 'रखडणार'? युद्धामुळे बांधकाम क्षेत्रासमोर मोठे संकट

Mumbai : चालू वर्षात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो घरखरेदीदारांसाठी एक

Navi Mumbai Crime : ऑनलाइन गेमिंगच्या नादात रिक्षाचालकाची सव्वाकोटींची फसवणूक, तर मंदिरात पुजाऱ्याचाच चोरीचा प्रयत्न

Navi Mumbai : नवी मुंबई परिसरात गुन्हेगारीच्या दोन वेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. एका घटनेत ऑनलाइन गेमिंगच्या

BKC : सकाळची वाहतूक सुरळीत; पण सायंकाळी पुन्हा कोंडीचेच चित्र

Mumbai : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) वाहतूककोंडीवर उपाय