“किमान पवारांनी तरी दिशाभूल करू नये”- मुख्यमंत्री

ईव्हीएम संदर्भातील शरद पवारांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांनी दिले ट्विटरवर प्रत्युत्तर


मुंबई : महायुतीला मिळालेली भरघोस मते आणि ईव्हीएम संदर्भात शरद पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलेय. याबाबत ट्विटरवर संदेश जारी करत किमान पवारांनी तरी जनतेची दिशाभूल करू नये असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.





विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मतांवर विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. निवडणुकीत ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. शरद पवार यांनीदेखील महायुतीला मिळालेल्या मतांबाबत शंका उपस्थित केली होती.


शरद पवार म्हणाले होते की, मोठ्या राज्यांमध्ये भाजप आणि छोट्या राज्यांमध्ये आम्ही आहोत. मतांची आकडेवारी बघून आश्चर्य वाटते. अजित दादा गटाची मत ५८ लाख मत असून त्यांचे ४१ उमेदवार निवडून आले. काँग्रेसला ८० लाख मत असताना त्यांचे १५ जण निवडून आले. निवडणूक निकालानंतर राज्यात उत्साह नाही, असे शरद पवार म्हणाले होते. महायुतीतील पक्षांना कमी मतं मिळून त्यांच्या जास्त जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीतील पक्षांना जास्त मत मिळून कमी जागा निवडून आल्या, याकडे पवारांनी लक्ष वेधले होते. याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर (एक्स) उत्तर दिले आहे.



जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? याबाबत सांगताना फडणवीसांनी गणित मांडले. २०२४ लोकसभेत भाजपाला १,४९,१३,९१४ मते मिळाली आणि जागा फक्त ९ मिळाल्या होत्या. पण काँग्रेसला ९६,४१,८५६ मते आणि १३ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला ७३,७७,६७४ मतं आणि ७ जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला ५८,५१,१६६ मते आणि ८ जागा होत्या.


यापूर्वीचे २०१९ च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला ८७,९२,२३७ मतं होती आणि १ जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला ८३,८७,३६३ मते होती आणि जागा ४ आल्याचे गणित फडणवीसांनी मांडले. आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका, असे फडणवीस म्हणाले. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, असे आवाहन फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शरद पवारांना केले आहे.

Comments
Add Comment

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस