“किमान पवारांनी तरी दिशाभूल करू नये”- मुख्यमंत्री

ईव्हीएम संदर्भातील शरद पवारांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांनी दिले ट्विटरवर प्रत्युत्तर


मुंबई : महायुतीला मिळालेली भरघोस मते आणि ईव्हीएम संदर्भात शरद पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलेय. याबाबत ट्विटरवर संदेश जारी करत किमान पवारांनी तरी जनतेची दिशाभूल करू नये असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.





विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मतांवर विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. निवडणुकीत ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. शरद पवार यांनीदेखील महायुतीला मिळालेल्या मतांबाबत शंका उपस्थित केली होती.


शरद पवार म्हणाले होते की, मोठ्या राज्यांमध्ये भाजप आणि छोट्या राज्यांमध्ये आम्ही आहोत. मतांची आकडेवारी बघून आश्चर्य वाटते. अजित दादा गटाची मत ५८ लाख मत असून त्यांचे ४१ उमेदवार निवडून आले. काँग्रेसला ८० लाख मत असताना त्यांचे १५ जण निवडून आले. निवडणूक निकालानंतर राज्यात उत्साह नाही, असे शरद पवार म्हणाले होते. महायुतीतील पक्षांना कमी मतं मिळून त्यांच्या जास्त जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीतील पक्षांना जास्त मत मिळून कमी जागा निवडून आल्या, याकडे पवारांनी लक्ष वेधले होते. याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर (एक्स) उत्तर दिले आहे.



जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? याबाबत सांगताना फडणवीसांनी गणित मांडले. २०२४ लोकसभेत भाजपाला १,४९,१३,९१४ मते मिळाली आणि जागा फक्त ९ मिळाल्या होत्या. पण काँग्रेसला ९६,४१,८५६ मते आणि १३ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला ७३,७७,६७४ मतं आणि ७ जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला ५८,५१,१६६ मते आणि ८ जागा होत्या.


यापूर्वीचे २०१९ च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला ८७,९२,२३७ मतं होती आणि १ जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला ८३,८७,३६३ मते होती आणि जागा ४ आल्याचे गणित फडणवीसांनी मांडले. आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका, असे फडणवीस म्हणाले. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, असे आवाहन फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शरद पवारांना केले आहे.

Comments
Add Comment

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय