मुंबई : महायुतीला मिळालेली भरघोस मते आणि ईव्हीएम संदर्भात शरद पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलेय. याबाबत ट्विटरवर संदेश जारी करत किमान पवारांनी तरी जनतेची दिशाभूल करू नये असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मतांवर विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. निवडणुकीत ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. शरद पवार यांनीदेखील महायुतीला मिळालेल्या मतांबाबत शंका उपस्थित केली होती.
शरद पवार म्हणाले होते की, मोठ्या राज्यांमध्ये भाजप आणि छोट्या राज्यांमध्ये आम्ही आहोत. मतांची आकडेवारी बघून आश्चर्य वाटते. अजित दादा गटाची मत ५८ लाख मत असून त्यांचे ४१ उमेदवार निवडून आले. काँग्रेसला ८० लाख मत असताना त्यांचे १५ जण निवडून आले. निवडणूक निकालानंतर राज्यात उत्साह नाही, असे शरद पवार म्हणाले होते. महायुतीतील पक्षांना कमी मतं मिळून त्यांच्या जास्त जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीतील पक्षांना जास्त मत मिळून कमी जागा निवडून आल्या, याकडे पवारांनी लक्ष वेधले होते. याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर (एक्स) उत्तर दिले आहे.
जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? याबाबत सांगताना फडणवीसांनी गणित मांडले. २०२४ लोकसभेत भाजपाला १,४९,१३,९१४ मते मिळाली आणि जागा फक्त ९ मिळाल्या होत्या. पण काँग्रेसला ९६,४१,८५६ मते आणि १३ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला ७३,७७,६७४ मतं आणि ७ जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला ५८,५१,१६६ मते आणि ८ जागा होत्या.
यापूर्वीचे २०१९ च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला ८७,९२,२३७ मतं होती आणि १ जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला ८३,८७,३६३ मते होती आणि जागा ४ आल्याचे गणित फडणवीसांनी मांडले. आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका, असे फडणवीस म्हणाले. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, असे आवाहन फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शरद पवारांना केले आहे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…