Allu Arjun : अल्लू अर्जुनकडून मृत महिलेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई

मुंबई : अल्लू अर्जुन याच्या 'पुष्पा २' या चित्रपटाचे हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये प्रीमियर शो चे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रीमियर शोसाठी अल्लू अर्जुन उपस्थित राहणार होता. ठरल्याप्रमाणे अल्लू अर्जुन त्याठिकाणी दाखल झाला. मात्र, यावेळी त्याला पाहण्यासाठी हैदराबादमधील संध्या थिएटरबाहेर प्रचंड गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एका महिलेला मृत्यू झाला. तर, तिचा मुलगा या घटनेत गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेवर अल्लू अर्जुनने दुःख व्यक्त केले आहे. अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपले दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृत महिला आणि जखमींना मदत करणार असल्याचेही त्याने व्हिडीओत म्हटले आहे.





या कठीण प्रसंगी मी महिलेच्या कुटुंबियांसोबत असून मी स्वतः जावून त्यांची भेट घेईल. मृत महिलेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई देणार आहे. तसेच उपचार आणि औषधांचा सर्व खर्चही आम्ही करू. त्यांच्यासाठी मला जे काही करता येईल ते सर्वकाही मी करेल. हे नुकसान कधीच भरून काढता येणार नाही. आम्ही तुमच्या दुःखात सामिल आहोत, असे त्याने व्हिडीओत म्हटले आहे.


Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू