राहुल गांधींनी आत्मचिंतन करावे- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राहुल गांधी यांनी ईव्हीएमवर दोषारोपण करण्याऐवजी आत्मचिंतन केले तर भविष्यात काँग्रेसला अधिक जागा जिंकता येतील असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते आज, शुक्रवारी एका मुलाखतीत बोलत होते.

यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, विरोधक ईव्हीएमला दोष देण्याचे काम करत आहेत. झारखंडमध्ये विरोधक जिंकले तिथे त्यांनी ईव्हीएमला दोष दिला नाही. परंतु, महाराष्ट्रामध्ये हारल्यानंतर ते ईव्हीएमला दोष देत आहेत. तर लातूरमध्ये अमित देशमुख जिंकतात तेव्हा ईव्हीएमला दोष देत नाहीत, पण धीरज देशमुख हारल्यानंतर लगेच विरोधक ईव्हीएमला दोष देतात. ईव्हीएम वर दोषारोप करण्यापेक्षा राहुल गांधींनी जर आत्मचिंतन केले तर, भविष्यात त्यांना जास्त जागा जिंकता येतील असे फडणवीस यांनी सांगितले.


भविष्यातील राज्याच्या योजनांबाबत फडणवीस म्हणाले की, ‘ग्रीन एनर्जी, नदी जोड प्रकल्पावर माझा भर राहणार आहे. हे प्रकल्प महाराष्ट्राला कायमचे दुष्काळमुक्त करू शकतात. राज्याच्या विकासाठी हाती घेण्यात येणारे सगळे प्रकल्प वेगाने पूर्ण होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच ‘मुंबईतील मढपासून विरारपर्यंत सी-लिंक तयार करण्याची योजना आहे. यासाठी जपानी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. मुंबईकरांचा प्रवास कमी करण्यासाठी आणि ट्रॅफिकपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 375 किमीचे मेट्रोचे काम होणार आहे. मेट्रोमुळे मुंबईकरांचे तीन तास वाचणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

EL Nino : 'अल निनो'मुळे दुष्काळाचा धोका ? पाणी जपून वापरण्याचे हवामान खात्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान विभागाने व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार यावर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्‍याची

Pranit More - Sejal Pawar Controversy : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी MBBS ची विद्यार्थिनी सेजल पवार सक्तीच्या रजेवर, चौकशी सुरू - माहिती

मुंबई : स्टॅन्ड अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या कार्यक्रमाचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Sheetal Mhatre : सिद्धिविनायक मंदिराच्या पुनर्विकासात देऊबाई पाटील यांच्या स्मृती जपण्याची मागणी

शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मागणी न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्याकडे पत्राद्वारे

Ashish Shelar : आपत्कालीन परिस्थितीचा इंटिग्रेटेड प्लँन करा

मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांची रेल्वे, महापालिका, बेस्टला सूचना मुंबई, पावसाळ्यात पूर परिस्थितीचे

Stand-up comedian Pranit More controversy : प्रणित मोरेच्या सर्व व्हिडिओंची सखोल तपासणी होणार

 गृह राज्यमंत्री पंकज भोयर; गृह विभागाकडून सायबर पोलिसांना आदेश जारी मुंबई : अश्लील आणि विकृत विनोदांमुळे

Bhandup News : भांडुपमध्ये फेरीवाल्यांचा वाद चिघळला; ज्येष्ठ नागरिकाला मारहाण? पोलिसांची कारवाई

भांडुप : भांडुपमधील शक्तीधाम मंदिर (Shaktidham Temple) परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला (Senior Citizen) झालेल्या कथित मारहाणीनंतर