राहुल गांधींनी आत्मचिंतन करावे- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राहुल गांधी यांनी ईव्हीएमवर दोषारोपण करण्याऐवजी आत्मचिंतन केले तर भविष्यात काँग्रेसला अधिक जागा जिंकता येतील असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते आज, शुक्रवारी एका मुलाखतीत बोलत होते.

यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, विरोधक ईव्हीएमला दोष देण्याचे काम करत आहेत. झारखंडमध्ये विरोधक जिंकले तिथे त्यांनी ईव्हीएमला दोष दिला नाही. परंतु, महाराष्ट्रामध्ये हारल्यानंतर ते ईव्हीएमला दोष देत आहेत. तर लातूरमध्ये अमित देशमुख जिंकतात तेव्हा ईव्हीएमला दोष देत नाहीत, पण धीरज देशमुख हारल्यानंतर लगेच विरोधक ईव्हीएमला दोष देतात. ईव्हीएम वर दोषारोप करण्यापेक्षा राहुल गांधींनी जर आत्मचिंतन केले तर, भविष्यात त्यांना जास्त जागा जिंकता येतील असे फडणवीस यांनी सांगितले.


भविष्यातील राज्याच्या योजनांबाबत फडणवीस म्हणाले की, ‘ग्रीन एनर्जी, नदी जोड प्रकल्पावर माझा भर राहणार आहे. हे प्रकल्प महाराष्ट्राला कायमचे दुष्काळमुक्त करू शकतात. राज्याच्या विकासाठी हाती घेण्यात येणारे सगळे प्रकल्प वेगाने पूर्ण होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच ‘मुंबईतील मढपासून विरारपर्यंत सी-लिंक तयार करण्याची योजना आहे. यासाठी जपानी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. मुंबईकरांचा प्रवास कमी करण्यासाठी आणि ट्रॅफिकपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 375 किमीचे मेट्रोचे काम होणार आहे. मेट्रोमुळे मुंबईकरांचे तीन तास वाचणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

फुलांची होळी उपक्रमातून महापौर रितू तावडे यांनी दिला पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश

मुंबई : होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक

दोन महिन्यांत राज्यातील सव्वा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

आरोग्य जागर : सिकलसेलपासून कर्करोगापर्यंतच्या मोहिमांना मोठे यश मुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ

राज्यातील अकुशल कामगारांच्या थकीत मजुरीचा प्रश्न सुटला

मनरेगा अंतर्गत १ हजार १६८ कोटींचा निधी मंजूर; होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा श्रमिकांना मोठा दिलासा मुंबई :

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह

आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना आणि मदतीसाठीचे हेल्पलाईन आणि व्हॉटसॲप क्रमांक

मुंबई : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या