राहुल गांधींनी आत्मचिंतन करावे- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राहुल गांधी यांनी ईव्हीएमवर दोषारोपण करण्याऐवजी आत्मचिंतन केले तर भविष्यात काँग्रेसला अधिक जागा जिंकता येतील असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते आज, शुक्रवारी एका मुलाखतीत बोलत होते.

यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, विरोधक ईव्हीएमला दोष देण्याचे काम करत आहेत. झारखंडमध्ये विरोधक जिंकले तिथे त्यांनी ईव्हीएमला दोष दिला नाही. परंतु, महाराष्ट्रामध्ये हारल्यानंतर ते ईव्हीएमला दोष देत आहेत. तर लातूरमध्ये अमित देशमुख जिंकतात तेव्हा ईव्हीएमला दोष देत नाहीत, पण धीरज देशमुख हारल्यानंतर लगेच विरोधक ईव्हीएमला दोष देतात. ईव्हीएम वर दोषारोप करण्यापेक्षा राहुल गांधींनी जर आत्मचिंतन केले तर, भविष्यात त्यांना जास्त जागा जिंकता येतील असे फडणवीस यांनी सांगितले.


भविष्यातील राज्याच्या योजनांबाबत फडणवीस म्हणाले की, ‘ग्रीन एनर्जी, नदी जोड प्रकल्पावर माझा भर राहणार आहे. हे प्रकल्प महाराष्ट्राला कायमचे दुष्काळमुक्त करू शकतात. राज्याच्या विकासाठी हाती घेण्यात येणारे सगळे प्रकल्प वेगाने पूर्ण होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच ‘मुंबईतील मढपासून विरारपर्यंत सी-लिंक तयार करण्याची योजना आहे. यासाठी जपानी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. मुंबईकरांचा प्रवास कमी करण्यासाठी आणि ट्रॅफिकपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 375 किमीचे मेट्रोचे काम होणार आहे. मेट्रोमुळे मुंबईकरांचे तीन तास वाचणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

थकबाकीदारांच्या मालमत्तांची अटकावणी केल्यानंतर थेट लिलाव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची भरणा नियोजित वेळेत न

मुंबईतील मालमत्ता कर थकवणाऱ्या २० थकबाकीदारांची नावे जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नव्या पद्धतीने भरती होणार मुंबई : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या

त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात नरेंद्र जाधव समितीकडून सरकारला अहवाल सादर

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीनं आज

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद

मुंबईच्या लोकलचा कायापालट होणार

मुंबई : गेल्या १०० वर्षात मुंबई आणि मुंबईकरांच्या लाडक्या लाईफलाइनमध्ये म्हणेजच लोकलमध्ये अनेक बदल झाले.