Kalidas Kolambkar : कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्षपदी शपथ!

मुंबई : विधानसभेच्या निकालानंतर (Assembly Election 2024) काल राज्याचे मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपा पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांचा शपथविधीही पार पडला.



आज राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आमदार कालिदास कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यामुळे आता विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन काळात यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचे कामकाज होणार आहे.



काय म्हणाले कालिदास कोळंबकर?


मी कालिदास कोळंबकर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी शपथ घेतो की... असे म्हणत कालिदास कोळंबकर यांनी राजभवनात विधानमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून आज शपथ घेतली. राज्यपाल राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुष्पगुच्छ देऊ त्यांचे अभिनंदन केले. तर, विधानपरिषद सभापती निलम गोऱ्हे यांनीही कोळंबकर यांचे अभिनंदन केले.



विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन


उद्यापासून विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. ९ डिसेंबर रोजी नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. तर १६ डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Comments
Add Comment

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,

नेरळ–माथेरान मिनी ट्रेन’ पुन्हा रुळावर!

पर्यटकांसाठी ऐतिहासिक रेल्वे सेवा १ नोव्हेंबरपासून रायगड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध