Kalidas Kolambkar : कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्षपदी शपथ!

मुंबई : विधानसभेच्या निकालानंतर (Assembly Election 2024) काल राज्याचे मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपा पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांचा शपथविधीही पार पडला.



आज राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आमदार कालिदास कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यामुळे आता विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन काळात यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचे कामकाज होणार आहे.



काय म्हणाले कालिदास कोळंबकर?


मी कालिदास कोळंबकर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी शपथ घेतो की... असे म्हणत कालिदास कोळंबकर यांनी राजभवनात विधानमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून आज शपथ घेतली. राज्यपाल राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुष्पगुच्छ देऊ त्यांचे अभिनंदन केले. तर, विधानपरिषद सभापती निलम गोऱ्हे यांनीही कोळंबकर यांचे अभिनंदन केले.



विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन


उद्यापासून विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. ९ डिसेंबर रोजी नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. तर १६ डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये