Baba Siddhiqui Murder : आधी सलमान खानच होता पण...; बाबा सिद्दीकी गोळीबारप्रकरणात आरोपीचा खुलासा

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खान नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या चित्रपटांसाठी चर्चेत असतो. सलमान खानचे अनेक चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान बिश्नोई प्रकरणात चर्चेत आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. फक्त हेच नाही तर सलमान खानच्या घरावर बिश्नोई टोळीकडून गोळीबार देखील करण्यात आला होता.


सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्यावर बिश्नोईच्या तीन शूटरकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर बिश्नोई टोळीकडून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आतापर्यंत २६ जणांना अटक करण्यात आलीये.



बाबा सिद्दीकी प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आता मोठा आणि धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. आरोपीने सांगितले की, बाबा सिद्दीकी यांच्या अगोदर सलमान खान हाच त्यांच्या निशाण्यावर होता. मात्र, कडक सुरक्षा असल्याने त्यांना सलमान खान याच्यावर गोळीबार करता आला नाही. त्यांनी अनेकवेळा सलमान खानवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सलमान खानच्या आजूबाजुला जास्त सुरक्षा असल्याने ते शक्य झाले नाही.


आरोपीचे बोलणे ऐकून सलमान खानच्या चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे. वारंवार बाबा सिद्दीकी गोळीबारप्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. सततच्या धमक्यांमुळे सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आलीये.

Comments
Add Comment

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस