Miraroad Metro : भीषण अपघात! मेट्रोचे काम करणारा मिक्सर २० फूट खोल खड्डयात कोसळला

  187

चालकाचा चिरडून मृत्यू, दोन जण जखमी


भाईंदर : मेट्रो मार्ग क्र.९ वरील मीरा गाव मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचल्यामुळे झालेल्या खड्यात एक मिक्सर पडून मिक्सरचा चालक मिक्सर खाली चिरडला जाऊन त्याचा मृत्यू झाला आहे तर दोन क्लिनर जखमी झाले आहेत. (Accident News)



मीरा भाईंदर मुंबई शहराला जोडण्यासाठी दहिसर ते भाईंदर मेट्रो मार्ग क्र.९ला (Miraroad Metro) शासनाने मंजुरी देऊन ९ सप्टेंबर २०१९ ला मेट्रोचे काम सुरू झाले होते. हे काम तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण होणार होते. परंतू अजूनही पुर्ण झालेले नाही. बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मीरा गाव मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचल्यामुळे झालेल्या साधारण २० फूट खोल खड्डयात मिक्सर कोसळला आणि त्या खाली आलेला चालक गंभीर जखमी झाला आणि उपचार दरम्यान गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. तर अन्य दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमनदलाने क्रेनच्या सहाय्याने सिमेंटचा मिक्सर खड्डयातून बाहेर काढला.



याआधीही झाला अपघात


घटनास्थळी योग्य ती सुरक्षा व्यवस्था नसल्याने याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी १ रिक्षा आणि ३ दुचाकीचा अपघात झाला होता. परिसरातील नागरिकांनी याबाबत काशीमीरा पोलिस ठाण्यात तसेच एमएमआरडी विभागाकडे तक्रार केली होती परंतु काही उपाययोजना झाल्या नसल्याची माहिती नागरिकांनी दिली.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही