Miraroad Metro : भीषण अपघात! मेट्रोचे काम करणारा मिक्सर २० फूट खोल खड्डयात कोसळला

  164

चालकाचा चिरडून मृत्यू, दोन जण जखमी


भाईंदर : मेट्रो मार्ग क्र.९ वरील मीरा गाव मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचल्यामुळे झालेल्या खड्यात एक मिक्सर पडून मिक्सरचा चालक मिक्सर खाली चिरडला जाऊन त्याचा मृत्यू झाला आहे तर दोन क्लिनर जखमी झाले आहेत. (Accident News)



मीरा भाईंदर मुंबई शहराला जोडण्यासाठी दहिसर ते भाईंदर मेट्रो मार्ग क्र.९ला (Miraroad Metro) शासनाने मंजुरी देऊन ९ सप्टेंबर २०१९ ला मेट्रोचे काम सुरू झाले होते. हे काम तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण होणार होते. परंतू अजूनही पुर्ण झालेले नाही. बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मीरा गाव मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचल्यामुळे झालेल्या साधारण २० फूट खोल खड्डयात मिक्सर कोसळला आणि त्या खाली आलेला चालक गंभीर जखमी झाला आणि उपचार दरम्यान गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. तर अन्य दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमनदलाने क्रेनच्या सहाय्याने सिमेंटचा मिक्सर खड्डयातून बाहेर काढला.



याआधीही झाला अपघात


घटनास्थळी योग्य ती सुरक्षा व्यवस्था नसल्याने याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी १ रिक्षा आणि ३ दुचाकीचा अपघात झाला होता. परिसरातील नागरिकांनी याबाबत काशीमीरा पोलिस ठाण्यात तसेच एमएमआरडी विभागाकडे तक्रार केली होती परंतु काही उपाययोजना झाल्या नसल्याची माहिती नागरिकांनी दिली.

Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये