भाईंदर : मेट्रो मार्ग क्र.९ वरील मीरा गाव मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचल्यामुळे झालेल्या खड्यात एक मिक्सर पडून मिक्सरचा चालक मिक्सर खाली चिरडला जाऊन त्याचा मृत्यू झाला आहे तर दोन क्लिनर जखमी झाले आहेत. (Accident News)
मीरा भाईंदर मुंबई शहराला जोडण्यासाठी दहिसर ते भाईंदर मेट्रो मार्ग क्र.९ला (Miraroad Metro) शासनाने मंजुरी देऊन ९ सप्टेंबर २०१९ ला मेट्रोचे काम सुरू झाले होते. हे काम तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण होणार होते. परंतू अजूनही पुर्ण झालेले नाही. बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मीरा गाव मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचल्यामुळे झालेल्या साधारण २० फूट खोल खड्डयात मिक्सर कोसळला आणि त्या खाली आलेला चालक गंभीर जखमी झाला आणि उपचार दरम्यान गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. तर अन्य दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमनदलाने क्रेनच्या सहाय्याने सिमेंटचा मिक्सर खड्डयातून बाहेर काढला.
घटनास्थळी योग्य ती सुरक्षा व्यवस्था नसल्याने याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी १ रिक्षा आणि ३ दुचाकीचा अपघात झाला होता. परिसरातील नागरिकांनी याबाबत काशीमीरा पोलिस ठाण्यात तसेच एमएमआरडी विभागाकडे तक्रार केली होती परंतु काही उपाययोजना झाल्या नसल्याची माहिती नागरिकांनी दिली.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…