बँक खात्यांमध्ये आता ४ नॉमिनी ठेवण्यास परवानगी

लोकसभेत मंजूर झाले बँकिंग दुरूस्ती विधेयक


नवी दिल्ली : बँक खातेधारकांना आता त्यांच्या खात्यामध्ये ४ नॉमिनी (वारसदार) ठेवण्याची परवानगी राहणार आहे. बँकिंग दुरूस्ती विधेयक आज, बुधवारी लोकसभेत मंजुर झाले. या विधेयकावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली.


अर्थमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार कोरोना साथरोगाच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या बँक खात्यांवर अनेक लोक वारस म्हणून दावा करत होते. अशा स्थितीत बँकांना अनेक प्रकारच्या कायदेशीर वादांना सामोरे जावे लागले. त्यामुळे हा निर्णय घेण्याची गरज भासली आहे. आत्तापर्यंत खातेदार एक नॉमिनी जोडू शकत होता, तर नवीन नियमानुसार, तुम्ही तुमच्या बँक खात्यात 4 नॉमिनी जोडू शकाल.


याशिवाय, खातेदार कोणत्या नॉमिनीला खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी किती टक्के रक्कम देऊ इच्छित आहे हे देखील ठरवू शकेल. जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात एकापेक्षा जास्त नॉमिनी हवे असतील तर तुम्ही खाते उघडण्यासाठी फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला तेथे चार नॉमिनी भरण्याचा पर्याय मिळेल. तुमच्या मृत्यूनंतर, खात्यातील रक्कम नियमानुसार तुम्ही निवडलेल्या नॉमिनीला दिली जाईल असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे