बँक खात्यांमध्ये आता ४ नॉमिनी ठेवण्यास परवानगी

लोकसभेत मंजूर झाले बँकिंग दुरूस्ती विधेयक


नवी दिल्ली : बँक खातेधारकांना आता त्यांच्या खात्यामध्ये ४ नॉमिनी (वारसदार) ठेवण्याची परवानगी राहणार आहे. बँकिंग दुरूस्ती विधेयक आज, बुधवारी लोकसभेत मंजुर झाले. या विधेयकावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली.


अर्थमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार कोरोना साथरोगाच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या बँक खात्यांवर अनेक लोक वारस म्हणून दावा करत होते. अशा स्थितीत बँकांना अनेक प्रकारच्या कायदेशीर वादांना सामोरे जावे लागले. त्यामुळे हा निर्णय घेण्याची गरज भासली आहे. आत्तापर्यंत खातेदार एक नॉमिनी जोडू शकत होता, तर नवीन नियमानुसार, तुम्ही तुमच्या बँक खात्यात 4 नॉमिनी जोडू शकाल.


याशिवाय, खातेदार कोणत्या नॉमिनीला खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी किती टक्के रक्कम देऊ इच्छित आहे हे देखील ठरवू शकेल. जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात एकापेक्षा जास्त नॉमिनी हवे असतील तर तुम्ही खाते उघडण्यासाठी फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला तेथे चार नॉमिनी भरण्याचा पर्याय मिळेल. तुमच्या मृत्यूनंतर, खात्यातील रक्कम नियमानुसार तुम्ही निवडलेल्या नॉमिनीला दिली जाईल असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.