बँक खात्यांमध्ये आता ४ नॉमिनी ठेवण्यास परवानगी

  47

लोकसभेत मंजूर झाले बँकिंग दुरूस्ती विधेयक


नवी दिल्ली : बँक खातेधारकांना आता त्यांच्या खात्यामध्ये ४ नॉमिनी (वारसदार) ठेवण्याची परवानगी राहणार आहे. बँकिंग दुरूस्ती विधेयक आज, बुधवारी लोकसभेत मंजुर झाले. या विधेयकावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली.


अर्थमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार कोरोना साथरोगाच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या बँक खात्यांवर अनेक लोक वारस म्हणून दावा करत होते. अशा स्थितीत बँकांना अनेक प्रकारच्या कायदेशीर वादांना सामोरे जावे लागले. त्यामुळे हा निर्णय घेण्याची गरज भासली आहे. आत्तापर्यंत खातेदार एक नॉमिनी जोडू शकत होता, तर नवीन नियमानुसार, तुम्ही तुमच्या बँक खात्यात 4 नॉमिनी जोडू शकाल.


याशिवाय, खातेदार कोणत्या नॉमिनीला खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी किती टक्के रक्कम देऊ इच्छित आहे हे देखील ठरवू शकेल. जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात एकापेक्षा जास्त नॉमिनी हवे असतील तर तुम्ही खाते उघडण्यासाठी फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला तेथे चार नॉमिनी भरण्याचा पर्याय मिळेल. तुमच्या मृत्यूनंतर, खात्यातील रक्कम नियमानुसार तुम्ही निवडलेल्या नॉमिनीला दिली जाईल असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व