CM Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद!

मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी (CM Oath Ceremony) उद्या मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच यावेळी लाडक्या बहिणींसाठीही विशेष आमंत्रण असणार आहे. त्यामुळे आझाद मैदानावर होणारी मोठी गर्दी पाहता मुंबई वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. यावेळी अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. दुपारी १२ वाजल्यापासून ते शपथविधी कार्यक्रम संपेपर्यंत वाहतुकीचे नियम लागू असणार आहेत.



कोणते मार्ग बंद?



  • महापालिका मार्ग - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वासुदेव बळवंत फडके चौकादरम्यान वाहतूक बंद

  • हजारीमल सोमानी मार्ग - चाफेकर बंधू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वाहतूक प्रतिबंधित

  • प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते कोस्टल रोड दरम्यानची दोन्ही बाजूंची वाहतूक बंद

  • आझाद मैदानात पार्किंगची व्यवस्था नसल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा आवाहन


पर्यायी मार्ग कोणते?



  • चाफेकर बंधू चौक - हुतात्मा चौक काला घोडा के दुबाश मार्ग शहीद भगतसिंग मार्ग इच्छित स्थळी प्रवास.

  • दक्षिणेकडील मार्ग एनएस रोड आणि कोस्टल रोडवरून श्यामलाल गांधी जंक्शनकडे वाहतूक वळवली जाईल.
    पर्यायी मार्गः एनएस रोडचा वापर करावा.

  • सय्यद जमादार चौक ते वोल्गा चौक या मार्गावर दुपारी १२ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असेल.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता