Earthquake : तेलंगणामध्ये भूकंपाचे जोरदार झटके, महाराष्ट्र-छत्तीसगडमध्येही जाणवले हादरे

मुंबई: तेलंगणामध्ये बुधवारी ४ डिसेंबरला सकाळी सकाळी भूकंपाचे(Earthquake) जोरदार झटके बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार तेलंगणामधील मुलुग जिल्ह्यात सकाळी सकाळीच ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे हैदराबादमध्येही हादरे जाणवले. सकाळी ७.२७ वाजण्याच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के बसले. याचे केंद्र जमिनीपासून ४० किमी खोल होते.


भूकंपाचे हे धक्के महाराष्ट्र आणि छत्तिसगडमधीलही काही परिसरात जाणवले. भूकंपाच्या या जोरदार झटक्यांमुळे अद्याप कोणत्याही प्रकारची जिवित अथवा वित्त हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. अधिकारी परिस्थितीचे आकलन करत आहेत. तसेच तज्ञांनी स्थानिक लोकांना भूकंपादरम्यान सतर्क आणि गर्दीच्या ठिकाणांपासून तसेच असुरक्षित इमारतींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

Comments
Add Comment

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून

Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन