Kashmir Shawl : काश्मिरी, पश्मिना, राजस्थानी शालींना पसंती; खरेदीसाठी महिलांची गर्दी‎!

किंमत अडीचशे ते नऊशे रुपयांपर्यंत


अमरावती : थंडी पडायला सुरुवात होताच उबदार कपड्यांच्या (Warm clothes) दुकानांवर तरुणांसह महिला, पुरुषांची स्वेटर, कानटोप्या, हातमोज्यांसह शाल खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. सध्या ढगाळ वातावरण असले तरी त्यानंतर मात्र थंडी वाढणार आहे. त्यामुळे साडी, ड्रेस, जीन्सवर शाही लूक येण्यासाठी यंदा शहरात तरुणींसह महिलांकडून शालींना मागणी होत आहे. यात पश्मिना, काश्मिरी, कुल्लू, राजस्थानी, कलमकारी, काठमांडू, पॉली वुलन, रेक्झीन, प्रिंट शालीला (Shawl) पसंती मिळत आहे. २५० रुपयांपासून ते ९०० रुपयांपर्यंत शाल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.



शहरातील दसरा मैदान, अंबादेवी- एकवीरा देवी परिसर, बापट चौक, मोची गल्ली, श्याम चौक, जवाहर गेट, इतवारा परिसरात उबदार कपड्यांची दुकाने थाटली आहेत. ९ डिसेंबरपासून शहरात कडाक्याची थंडी पडणार आहे. यामुळे आतापासूनच अमरावतीकर स्वेटर खरेदी करताना दिसून येत आहेत. मंगळवारी श्याम चौक परिसरात तिबेटियन विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी वाढली होती. दरम्यान, बाजारात वजनाने हलकी आणि उबदार पॉली वूलन शालीला पसंती होती. शिवाय, महिलांसह तरुणींकडून रॉयल लूकसाठी राजस्थानी आणि पश्मिना, काश्मिरी शालीला पसंती मिळत होती. सुमारे ४५० ते ९०० रुपयांना या शाल उपलब्ध आहेत.


हँड प्रिंट, ब्लॉक प्रिंट डिझाइनला पसंती उबदार कपड्यांच्या बाजारात पॉली वूलन शाल, रेक्झीन शाल, प्रिंट शाल, जॉल शाल, प्लेन, अँक्रा शालसह प्युअर वूलन शाल विविध डिझाइनमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. लोकरीपासून तयार केलेली कुल्लूची पट्ट शालही बाजारात विक्रीला आहे. हँड प्रिंट, ब्लॉक प्रिंट डिझाइन्स केलेल्या कलमकारी शालचेही आकर्षण वाढले आहे. ही शाल साडी, ड्रेस, जीन्सवर अधिक शोभून दिसते. तिबेट, काठमांडू, जगदंबा शाल ३३० ते ८५० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना